#MaharashtraShaheer
जी पांढरपेशी कुटुंबं शाहिरांच्या कलेवर फिदा होती त्याच एका घरापैकी मी ही आहे. लहानपणी कानावर मोठ्यांकडून शाहिरांंचे कौतुक कानावर पडत असे, त्यांच्या कलेबद्दल, कार्यक्रमांबद्दल दूरदर्शन वर लागलेले बघितले जायचे, सर्वांना आवडायचे इतपतच माहीत होते. मग चारूशिला वाच्छानी, केदार शिंदे यांच्या कामातून हा वारसा पुढील पिढीत येत राहिलेला पाहून जीव सुखावत राहिला.
या ग्रुपवर मात्र वसुंधरा ताई यांच्या लेखनातून लोकधारेची, त्यांच्या कुटुंबियांची आणि शाहिरांच्या जीवनपटाची विस्तृत ओळख होत गेली आणि किती थोर कलावंत महाराष्ट्राला लाभले याची नव्याने जाणीव झाली.
आताशा ott आल्यानंतर आणि कोविड ने घरबसल्या सर्व कारभार करााची सवय लावल्यावर खरोखर चित्रपटगृहात जाण्यापेक्षा आला ott वर कि बघू असे झाले आहे. पण उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना मोठा पडदाच न्याय देऊ शकतो, हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
एक अख्खं आयुष्य, त्यातल्या चढउतारांसह चित्रपटात सामावून कलाकृती प्रत्यक्षात आणणं या सारखं अवघड शिवधनुष्य सर्व टीम ने मनापासून पेलले आहे, शाहिरांना मुलांची भरारी कौतुकाने पाहता आली, पण माझ्यासारख्या अनेक जणांना लोकधारा कळत्या सवरत्या वयात अनुभवायला मिळायला हवी ही हुरहुर लावत हा चित्रपट संपतो.
इतर पोस्ट मधे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली या सारखे काढलेले निष्कर्ष घाईघाईने काढू नये असे वाटते, long weekend आहे, मुलांचे निकाल घेऊन सगळे गावाला गेले आहेत, मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रेक्षक या चित्रपटाकडे आणि केदार शिदेंच्या कलाकृतीकडे पाठ फिरवणार नाही हे निश्चित.
याच प्रेमापोटी एक आणि फक्त एकच खटकलेली आणि कितीही करु म्हटलं तरीही दुर्लक्ष करता न येण्याजोगी गोष्ट म्हणजे सना शिंदेचा मराठी लेहजा.
त्या काळातील गावातील मुलीच्या तोंडी जो लेहजा अपेक्षित आहे तो सापडला नाही. पदार्पणातच अवघड भूमिका ज्यात अनेक कंगोरे आहेत ती साकारताना दमछाक होणे स्वाभाविक आहे, पण....
असो, बाकी सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संगीत, गायक आणि अंकुश नावाचा झंझावात....... अ प्र ति म