Thursday, July 7, 2016

जाग

तुला भेटले तेव्हा पासून एक कुतूहल मिश्रित कौतुक वाटत आलंय तुझ्या बद्दल . निसर्गदत्त देखणेपण तुला लाभले आहेच . त्यावर तू आपल्या पेहरावातून व राहणीमानातून आपल्या व्यक्तिमत्वाला नेहमीच आकर्षक राखत आली आहेस .
लहान शहरातून येउन देखील इथे आल्यावर तू स्वहुशारीने तुझ्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचा जम बसवलास . त्यात तुला तुझ्या कुटुंबियांची यथायोग्य साथ सोबत होतीच .
तुझी स्वप्नं विस्तारली . तुला नवी क्षितीज खुणावायला लागली…….
या तुझ्या नवीन ' हटके ' नादाच देखील कौतुक वाटलं तेव्हा . अश्या जगावेगळ्या नादिष्टपणा ला सुद्धा धमक लागते . यातून तुझी असीम आनंद घ्यायची वृत्तीच झळकत होती .
तू त्यात रमत चालल्याच्या सर्व खुणा सर्वत्र जाणवत दिसत होत्या . ते पाहून बरं तर वाटत होतंच तरी पण काही तरी चुकल्या चुकल्या सारखं हि वाटत होतं . तुझं कौशल्य ज्या क्षेत्रात होतं ते कुठेतरी या सगळ्यामध्ये हरवल्या सारखं झालं होतं .
एकदा वाटला हे नवं जग क्षणिक आहे आणि तू त्यात फार काळ रेंगाळणार नाहीस . पण ते झालं नाही . ज्या कौशल्याच्या बळावर माझ्या सारख्या अनेक जणी तुझ्या शी जोडल्या गेल्या होत्या , त्या पासून तू फारकत घेतल्या सारखी वाटायला लागलीस .
आणि ती बातमी कानावर आली .
ती धक्कादायक वाटली पण कुठेतरी अपेक्षित देखील वाटून गेली . त्यातला धक्का हा खरंतर चटका लावून गेला होता . त्या बातमीने तुझ्या कौटुंबिक धाग्यावर अवलंबून असलेल्या निरागस जीवावर होणारे परिणाम तरळून गेले . पण कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसतंय हे दूरवरून तुला पाहणाऱ्या आम्हा सर्वांना जाणवत होतं . त्यामुळे या बातमीने आश्चर्य मात्र वाटलं नाही .
वाईट या गोष्टीचा वाटतं कि तुला ते वेळीच कळलं नाही .
जो हव्यास होत्याचं नव्हतं करतो … तो खरंच त्या लायकीचा असतो का ?
जे स्वप्नं सुंदर शाश्वताला हादरावते … ते उराशी कवटाळयचा अट्टाहास का ?
जितकं लवकर यातून जाग येईल तितकं बरं .
अजूनही वेळ गेलेली नाही . चुका मान्य करायची वेळ कधीच जात नाही .
चुकलेली वाट सोडून आपल्या कळपात परतायची वेळ असेल तर सोडू नकोस .
माझ्या सारख्या तिर्हाईतआला देखील तुझं असं आप्तान पासून दुरावणं त्रास देऊन जातं ग .
सामोरी जा ………. स्वतःला तपासून बघ .
मदत घे हात देणार्यांची . काहीही कर .
पण नको गं ………. नको असं होऊ देउस .

Tuesday, May 5, 2015

so smart of us


किती सोप्पं झालंय न सगळं 
या स्मार्ट फोन ने जग हातात आणून दिलंय
आपण आणि आपला फोन ……. बस यांचच एक चिरेबंदी जग 
त्यात शेजारी बसलेल्या ला शिरकाव नाही …. 
पण आपण मात्र फोन मधून तिऱ्हाई ता च्या जगात मनसोक्त फेरफटका मारून येऊ शकतो 
एका हाताने , आपल्या खाजगी आयुष्यातले सौख्य जगाला दाखवत ,
दुसर्या हाताने त्याच सौख्याला दृष्ट हि लावू शकतो … कसं काय ?

 जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं याच्या सीमारेष्या स्मार्ट फोन ने  इतक्या धूसर केल्या  आहेत 
कि आपल्याला वाटतच नाही आपण काही गैर किंवा अवैध करतो अहोत. 
किंवा असं म्हणू हवं तर, पूर्वी पर्याय नसे म्हणून तरी आपण एकनिष्ठ राहत असू, 
आता ते दिवस केव्हाच मागे पडले …… 
तुम्ही, आम्ही अगदी कुणीही , मनात येता  क्षणी, या स्मार्ट  फोन च्या कृपेने आपली वाट वाकडी करू शकतो . 
पूर्णपणे खाजगीत , जोडीदाराला शंका हि न येता . घराबाहेर सुद्धा न पडता . 
पर्सनल मेसेजेस च्या स्वरूपात सुरु होणारं साधसं च्यॅटिंग कधी चावट  गप्पां चा रस्ता धरत, 
अतिशय इंटीमेट आणि गहिऱ्या संबंधांमध्ये परिवर्तित होतं ………  आपलं आपल्याला हि कळत नाही 
खरं म्हणजे कळत सगळं असतं , पण वळत मात्र नाही .  

पूर्वीचे माणूस ओळखायचे ठोकताळे केव्हाच गळून पडले . 
एखाद्याची नजर, वागणं बोलणं , पेहराव यावरून एखाद्या ची चाल , वळण लक्षात येत असे . 
आता कोणाबद्दल आडाखे बांधायची सोय राहिली नाही . 
आपलीच एखादी मैत्रीण , शेजारी, ओळखीतले काका, अगदी घरातला कोणी सदस्य ……. 
कोणाचा स्मार्ट फोन कोणाचे काय काय अंतरंग दाखवेल याची शाश्वती  नाही . 

सगळ्या गोष्टी सोप्प्या केलेल्या स्मार्ट फोन ने हे बाकी अवघड करून ठेवले आहे . 

anubandh

कामवाली बाई शी आपले संबंध हे एक अजब रसायन आहे.
 एका प्रकारे वाळवंट च …… कितीही काहीही पेरा , खत पाणी घाला , निगा राखा …. ते उजाड आणि ओसाड च राहतं .
क्वचित कधी आभास होतो मृगजळाचा …. पण फार काळ टिकत नाही तो आभास …. 
पण काही आभास त्या त्या काळा पुरते का होईना , इतके खरे असतात , आणि इतक्या सुखद  आठवणी देऊन जातात , कि ते क्षण मनात कायम जपले जातात . 

अशाच काही जणी मनात घर करून बसल्या आहेत . 

शिडशिडीत बांधा , सावळा वर्ण , दोन्ही खांद्यावरून पदर , चेहऱ्यावर धीर गंभीर तरीही मृदू भाव  अशा सविता बाई माझाकडे पोळ्या करून द्यायच्या . शांतपणे  येउन आपलं काम करून जायच्या . फार काही बोलाचाली व्हायची नाही त्यांच्याशी . आपण बरं आणि आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव . पोळ्या स्वैपाकाच्या कामा सोबत त्या बाळ बाळनतिणी ची कामं सुद्धा करायच्या . साहजिकच सावनी च्या वेळी स्वैपाक आणि बाळा च काम आपसूक त्यांनाच सोपवलं . 
काम करता करता त्या मूकपणे पाहत असत . त्या वेळी हळवं झालेलं माझं मन सहजपणे त्यांच्या पाशी मोकळं व्हायला लागलं . त्या अल्प संभाषणातून त्या काय समजायचं ते समजल्या …. आणि मग मात्र त्यांनी जणू माझं पालकत्व च घेतलं .
 रोजचं बाळा च आवरल्यावर त्या स्वैपाक घरात जात , मला टेबलाशी ताट देऊन बसवत आणि गरम गरम भाकरी वाढून खायला लावत . कधी भाकरी सोबत खीर करून देत . एकदा माझासाठी पाया सूप केलं आणि बाळनतिणी ने ते पिणं किती पौष्टिक आहे हे पटवत मला प्यायला लावलं . 
त्यावेळी माझी नेमकी गरज त्यांनी ओळखली होती …......... ………… ………………. 
त्यांनी मायेनं केलेल्या  या छोट्या छोट्या गोष्टींनी मला त्या  त्या क्षणी काय आणि किती किती दिलंय याचं मोजमाप होऊच शकत नाही . 

त्या पाठोपाठ आठवते योगिता . गोबऱ्या गालाची , उंच , भरल्या अंगाची , पण अतिशय निरागस डोळ्यांची योगिता केर फरशी भांड्यान साठी माझाकडे कामाला होती . 
तुटल्या विखुरल्या घरातून आलेली योगिता , काका काकी जवळ राहायची . कामं करून पैसे कमावून काकी कडे सुपूर्द करायची . 
लहान वयात आलेलं मोठेपण , जगाने शिकवलेलं शहाणपण तिच्या टपोऱ्या डोळ्यात साठलेलं असायचं . मग कामावर आली कि माझाशी बोलता बोलता सगळं साचलेलं उसनं अवसान त्याच टपोऱ्या डोळ्यांवाटे घळा घळा गाला न वरून ओसंडून जायचं .
 घटका दोन घटका बोलणं … पण कुणी ऐकून घ्यायला आहे , हा दिलासा तिला पुढचे अनेक दिवस पुरायचा . आपली कर्म कहाणी ऐकवून , त्या बदल्यात तिला काही नको असायचं , न कसली मदत न सवलत . त्या विसाव्या च्या क्षणांनी , क्वचित माझ्या वडीलकी च्या शब्दांनी त्या क्षणी तिच्या मनाला हवी असलेली फुंकर तिला मिळायची आणि ती डोळे पुसून, ओढणी खोचून पुढल्या कामाला निघून जायची . लग्नं ठरल्यावर चेहऱ्यावर वेगळंच तेज घेऊन यायची ती . जणू दिवस पालटल्या ची ती नांदी होती . आणि खरच तिचे  दिवस पालटले . लग्न होऊन दोन बाळांची आई झालेल्या योगिता ची खुशाली अधून मधून कळत  असते . 


योगिता ने काम सोडायच्या सुमारासच अनिता घरात आली .
 काळी सावळी , तीक्ष्ण पण गांगरलेल्या नजरेची आणि अंगाने कटक अनिता महाड नजीकच्या गावाहून माझाकडे कामासाठी राहायला आली .
 अचानक आपलं घर , माणसं सगळं सोडून आमच्या सारख्या  अनोळखी लोकांसोबत राहायला आलेल्या त्या मुलीला सगळंच नवं होतं . नवी जागा , शहरातली राहणी , मागे पडलेलं घर , सगळ्या पायी काही दिवस ती अगदी गप्पं गप्पं असायची . कामापुरतं सुद्धा बोलायची नाही , फक्त काही विचारलं तर उत्तर द्यायची .
 पण घरात बाळ असलं कि कोणीच फार काळ गप्पं राहू शकत नाही . त्या प्रमाणे तीही सावनी ला खेळवताना हळू हळू बोलती झाली . 
पण काही दिवसातच माझ्या लक्षात आलं , कि हि पट्ठी अजिबात नीट  जेवत खात नाहीये . तिला आपल्याकडची गुळमुळीत चव आवडत नाही हे लक्षात आले . तेव्हापासून मी तिला तिच्या चवीनुसार भाजी आमटी करून घ्यायला सांगितलं . 
सर्वप्रथम तिने काय केलं असेल तर ढीगभर कांदा आणि ढीगभर लसूण ढीगभर तेलावर परतून झणझणीत कांदा लसुण  मसाला करून ठेवला . आता रोजच्या भाजीत तो आपल्यापुरता घालून घेऊ लागली , मुख्य म्हणजे व्यवस्थित जेऊ लागली . 
हळू हळू सर्व घरकामाचा ताबा अनिता ने घेतला . स्वच्छ आणि चटपटीत काम न कंटाळता करायची ती . 
सहा महिने रात्रीची झोप विसरलेल्या मला  खऱ्या अर्थाने आराम मिळायला लागला . 
कामाचा व्याप बराचसा हलका झाल्याने मी ………व आमच्या सारखं आमच्या बरोबरीने चांगलं चुंगलं राहणं आणि खाणं पिणं होऊ लागल्याने ती ............................................. दोघीही तब्ब्येतीने  सुधारलो . 
आमच्याशी सूत जुळल्याने म्हणा किंवा स्वकष्टाच्या कमाईतून होणाऱ्या समाधानाने म्हणा ती घरात चांगलीच रुळली . 
पण शेवटी हनिमूनच तो . तीचासाठीही आणि माझासाठीही . तरीही दीड वर्ष टिकला . 
काही दिवसान पासून माझी नजर चुकवून बाहेर ती काही उद्योग करू पाहतेय हे माझा लक्षात यायला लागलं . विश्वासात घेऊन विचारलं तर खरं बोलेना . मग ओळखलं ……आता हि जोखीम सांभाळण शक्य नाही . 
तात्काळ तिच्या पुण्यातल्या दूरच्या भावाला बोलावून तिला निरोप दिला .
 वाटलं होतं हि ही इथूनच लग्न ठरून मार्गी लागेल . तरीही तिने  मनापसून केलेल्या कष्टा चा विसर पडणं अशक्य होतं म्हणून तिचा लग्ना  करिता देण्यासाठी ठेवलेली आहेराची रक्कम भावाकडे देऊन टाकली आणि मनातून तिला शुभाशीर्वाद देऊन पाठवून दिले . 

नुकतीच सहा महिन्यांपूर्वी लग्न होऊन गावी गेलेली नीना . 
तिच्या इतकं भाबडं ध्यान मी आजतागायत पहिले नाही . अगदीच ठेंगणी आणि ठुसकी पण जाडजूड बांध्याची होती नीना . वरकामाला लागली ……मी सांगितलेलं काम अगदी जीव ओतून करायची .
 अगदी तिचं  समाधान होई पर्यंत………. माझं समाधान झालं असण्याशी तिचं काही घेणं देणं नसायचं . त्या पायी तिचे वरकामाचे तास  भरले तरी तिला फिकीर नसायची . तिला उशीर होईल या  जाणीवेने माझी घालमेल झालेली असायची . पण ती निवांत . 
या कष्टकरी जीवाची हि एक अत्यंत दुखरी जखम होती . अर्धवट वयातल्या अर्धवट लग्नाची . त्या पायी लागलेल्या बट्ट्या ची  . त्या पायी आता समज आल्यावर देखील  नव्याने लग्न  ठरण्यात  येत असलेल्या अडचणीची .  ३० शी च्या जवळ येउन  देखील संसाराचे स्वप्न पूर्ण न होण्याची . 
त्या काळजीने म्हणा , दोन तीनदा ठरत येउन मोडलेल्या सोयरिकी ने म्हणा तिने काही काळ अंथरूण धरलं . १५ दिवसांनी बरी होऊन आली तेव्हा परिस्थिती स्वीकारल्याचा भाव त्या भाबड्या चेहऱ्यावर होता . पण आतून उदासच असायची . 
शेवटी नात्यातलाच एका भावाशी सोयरिक जुळली आणि कळी खुलली . होणारा  नवरा भाऊ होता , वयाने तिच्याहून लहान होता , चेहऱ्यावर च नाही तर शरीरभर विद्रूप ते च्या खुणा असलेला होता ..........................................  कशा कशानेच ती डगमगली नाही . साचलेलं डबकं आता प्रवाही होणार यातच तिला सगळं मिळालं होतं . 








Monday, August 26, 2013

happy friendship day

Its that day of the year to cherish friendships.
Its also a chance to thank this virtual world to have eased out everything related to this wonderful bond.

A tool to reconnect with childhood friends, with whom innocent memories have been shared. Its such a proud feeling to know that they have created a beautiful world of their own. Its so nice to bless their loved ones through the photos shared, and there is no feeling of having missed out each other's milestones.

A tool to relocate adolescent crushes, who have if not anything else helped us know ourselves better. It is great to know them as grown-ups, all settled into domesticity & scaling new heights in their lives.

A tool to make new friends is the most unbelievable thing to have happened to me. Orkut gets the credit of giving me a bunch of amazing girl-friends & over the last few years we have taken our bonding from the virtual to the real world too.

A tool to connect with friends who may be at the other end of the universe, but their min-to-min updates give us the feeling that they are next door neighbours. Their sharing of experiences, their adventures, their trips to amazing locations through their uploads become our own as if it is our joy ride into their lives.

It is as if we are all enjoying together, pledging our likes to each other's achievements and also offering back-up in troubled times. Although nothing can be compared to the physical presence of a friend, this virtual boon is any day better than a lonely survival.

Happy Friendship Day to all my friends !!!!!!!!!!!!

Wednesday, May 29, 2013

Breaking news

काय केलंस तू हे? आणि का? केवळ एका बिघडलेल्या  gene ने तुझी खात्री   पटली कि तुझा मृत्यू केवळ कॅन्सर नेच होणार आहे? आणि तो टाळ लास कि जगात कशा कशा पासूनही तुला धोका नाही?
इतकी सुंदर, इतकी जगात वावरलेली, स्वतःचे स्थान निर्माण केलेली तू, आणि बस या एकाच निर्णयाने अख्या जगाला तू बुचकळ्यात टाकले आहेस, याची तुला जाणीव  तरी आहे का?
तू म्हणतेस हे तू मुलांसाठीच केलंस …त्यांना अकाली पोरके होण्यापासून वाचवण्याकरिता केलंस
काय सांगतेस कोणाला आणि किती फसवशील स्वतःला ?
इतक्या पुढारलेल्या देशात लहानाची मोठी झालीस ते काय तिथली संस्कृती अंगात न भिनवता ?
फ्री सेक्स , व्यसनं या सवयी तुला कधी नव्हत्याच? तेव्हा बिनदिक्कत सगळं अंगीकारला असशील न?
त्याचा तुझा शरीरावर, आरोग्यावर काहीच परिणाम झाला नसेल?
मग  सर्व बाजूंनी स्थिरावल्यावर मारे मुलांना दत्तक घेतलंस आणि कुटुंबवत्सल झालीस पण जसं नुसतं जन्म देऊन पालक होता येत नाही तसाच दत्तक घेऊनही होता येत नाही, हे माहित नसेल तुला कदचित.
आपल्या जीवनशैलीवर हजार बंधनं लादून घ्यावी लागतात, आपल्या उदाहरणातून त्यांनी शिकण्याकरिता वेळ प्रसंगी मन मारत वर्तन ठेवावं लागतं . पालक म्हणून आपलं काय काय त्यांना अनुकरणीय आहे हे स्वतःशी शंभरदा तपासून पाहायला लागतं . शारीरिक खस्ता खाल्ल्या नाहीत तरी या पासून कोणत्याही जबाबदार पालकाची सुटका नाही .
मग जगाचा निरोप घेताना काय सोडून जाणारेस त्यांचा करिता ज्याचं त्यांनी अनुकरण करावं ?हा भ्याडपणा ?.....
 तुझं ठीक आहे ग … तू आधी अवयव काढून टाकशील, मग शरीर सुडौल दिसावा म्हणून प्लास्टिक सर्जरी करशील, आणखी काय काय काढून परत आहे तसे तुकतुकीत दिसावे म्हणून पैशांचा पाऊस पाडशील , पण यातून तू जो संदेश देतेस न …… तो फार जहाल आहे, आणि नकारात्मक आहे, live life on your own terms .....' ती धमक माझात आहे आणि बाकी पामरांनी बसावं तोंडात बोटे घालून, अथवा मी आखून दिलेल्या वाटेवर निमूट चालावं '
त्यातून आता आधीच गालबोट लागलेल्या वैद्यकीय व्यवसायाचे चांगलेच फोफावणार आहे, तुझे उदाहरण देऊन, तुझा सारख्या भित्र्या धनिकांना ते अलगद जाळ्यात ओढणार यात शंका नाही … हाच नवा खात्रीलायक उपाय कॅन्सर पासून जगाला वाचवू शकतो…हे आता वाऱ्याच्या वेगाने पसरणार, आणि आम्ही बापडे नवी बातमी येईस्तोवर तुझा करामतीवर शेरे मारत बसणार .

Sunday, December 9, 2012

aupacharik

#औपचारिक 

काय कसे काय ??? सगळं ठीक ?.......
तुझा काय चाललंय.....
माझा काय चाललंय.......
सुरळीत सर्व गणित ????
त्या पलीकडे नकोच आता नसत्या उठाठेवी........
कोरड्या उरलेल्या नात्याची आता गरज काय उरली ?
तिच्या अस्तित्वामुळे जे जुळलं आणि फुललं
तीच नाही म्हटल्यावर आता खोलात का शिरावं ?
कि हे माझंच लांब पळणं आहे ........... ?
कदाचित....
नको ते ऐकायला लागू नये 
या भीतीने डोकावणारी असुरक्षितता आहे....
पण नक्की कसली.......?
काही ठीक नाही हे कळल्या वरची ....
कि सर्व काही खूपच ठीक आहे हे कळल्या वरची !!!
ती होती तेव्हा काही ठीक नव्हते.....
हे ऐकल्या वरची.......
कि......ती गेल्या मुळेच ......
सर्व काही ठीक झालंय हे सुचविल्याची.......
नक्की कशाची..............?

-मीनल देवस्थळे 

Monday, December 19, 2011

पर्व नवे

ऑन-लाईन मैत्री हि या दशकाची एक देणगी आहे यात वाद नाही. या मैत्री मध्ये जितकं थ्रील, वेगळेपण, तितकीच रिस्क सुद्धा. एखादा आश्वासक दुवा सापडला तर मात्र प्रत्यक्ष मैत्री इतकाच आल्हाद दायक अनुभव मिळतो हा माझा अनुभव. आमच्या तनिष्का परिवार बाबत तरी हेच म्हणता येईल.
'तनिष्का' हे सकाळ वृत्तपत्र समूहाचे नवीन मासिक ५ वर्षान पूर्वी हातात आले आणि त्यातील विषय हे नेहमीच्या टिपिकल महिला स्पेशल मासिकान पेक्षा हटके आहेत हे जाणवले. तोवर मासिकान मध्ये सरधोपट अशी दोन टोकं होती. एक बाजूला 'बेहेनजी' प्रकारातील साचेबद्ध घरेलू विषयांना आधुनिकतेची फोडणी पेरलेली, त्यातील कथा या आपल्याशा न वाटणाऱ्या, त्यातील टिप्स वाचून वाचून चोथा झालेल्या, कौटुंबिक प्रश्नोत्तरे हि निव्वळ मासिकाचा खप वाढवा या साठी निर्मिलेली तडक-भडक अशी 'सहेली', 'मैत्रीण',वुमेन'स इरा', मधून डोकावणारी. आणि दुसर्या बाजूला अगदी उच्चभ्रू वर्गाला साजेसे 'फेमिना' गटातील मासिके ज्यात फेशन, मेकप, आणि घरभेदी विचारसरणी चा भडीमार या शिवाय काही नसे.
या दोन्ही टोकाच्या वर्गातील स्त्री मासिकान मध्ये समन्वय साधत मुख्यत्वे वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक जाणिवेचे खाद्य पुरविणारे मासिक म्हणून 'तनिष्का' समोर आले.
आजूबाजूच्या पुरुष प्रधान जगात, लढत,झगडत का होईना पण पण आपले स्थान मागत वावरणाऱ्या , स्व-ओळख असलेल्या आणि त्यामुळेच स्वतंत्र विचारसरणीच्या अश्या स्त्रियांचे खर्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे मासिक म्हणून 'तनिष्का'ने आपली ओळख प्रस्थापित केली आणि आमच्या मनात घर केले.
कालानुरूप या मासिकाने खास 'netizens' पर्यंत हि पोचता यावे या कारणाने ओर्कुट वर 'तनिष्का' नामक ऑन-लाईन समूह चालू केला. त्याची लिंक मासिकावर झळकू लागली. फेसबुक शी अजून मैत्री न झालेल्या पण ओर्कुट वर बर्यापैकी स्थिरावलेल्या माझ्या सारख्या अनेक सख्यांना नवीन लिंक आकर्षित करू लागली. बघूया तरी काय प्रकार आहे या विचाराने सभासदत्व घेतले गेले.
सुरवातीला केवळ मूक वाचक राहणे माझा सारखेच अनेकींनी पसंत केले. त्या काळात इतर सहभागी मेम्बर्स च्या पोस्ट्स वाचणे आणि एकेकीची एकतर्फी पारख करणे चालू असायचे. मग हळू हळू विश्वास दृढ व्हायला लागल्यावर प्रकट होऊन पोस्ट्स टाकणे, नवीन टोपिक्स टाकणे आणि त्यावर चर्चा करणे सुरु झाले. जुन्या जाणत्या मेम्बर्स नीच मग मराठी फोन्ट कसा वापरायचा ते हि शिकवले. आशा तर्हेने सावध पावले टाकीत सुरु झालेला प्रवास मजल-दरमजल करीत वेग घेऊ लागला.
समुहात प्रकट होऊन सहभाग घेणाऱ्या सख्या दूरवर पसरलेल्या आहेत. यु.एस, सिंगापोर, ओमान, युके, मधून तर आहेतच पण महाराष्ट्रात देखील जयसिंगपूर, फलटण, कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे सांगली, सातारा, रत्नागिरी ,सोलापूर आणि भारतभर देखील उज्जैन, हैदराबाद येथे हि आहेत. पण असे लक्षात आले कि पुण्यातील सख्या मेजोरीटी मध्ये आहेत आणि समूहाची समन्वयक आणि सर्वेसर्वा मंजिरी फडणीस हिच्या शी बोलून एक कल्पना सुचली.
आजवर केवळ ऑन-लाईन भेटलेल्या पण एव्हाना एकमेकींना पुरेपूर ओळखलेल्या मेम्बर्स चे पुण्यात सारसबागे मध्ये पाहिले गेट-टुगेदर ठरले. त्यात शहरातील व चिंचवड, कल्याण,फलटण आणि जय्सिंपूर हून देखील सख्या आल्या होत्या. समोरासमोर आल्यानंतर खरेतर पहिल्यांदा भेटल्याचा फील आम्हाला कोणालाच आला नाही, तरीही आमची ओळख आणि मैत्री वर्चुअल जगातून वास्तवात दृढ झाल्याचा आनंद काही औरच होता हे निश्चित.
त्या नंतर आजवर अनेक गेट-तुगेदर्स झाली, कधी संभाजी बागेत कधी सारस बागेत तर दोन तीनदा पानशेत मधील सूर्य शिबिरात हि सहली झाल्या.
मंजिरी फडणीस ने आजवरच्या एकूण एक नाही पण जास्तीत जास्त गेट-तुगेदर्स मध्ये नुसती हजेरीच नाही तर वेळ काढून सहभाग घेतला आणि ऑन-लाईन नव-नवीन विषय काढून आम्हाला प्रतिक्रिया द्यायला, लिहायला उद्युक्त करून अनेकदा मासिका मध्ये आमची नावेही छापून आणली. अनेकींचे छंद, त्यातून त्यांनी केलेले अर्थार्जन कधी समाजकार्य समोर आले. अनेकींच्या कौतुकाने, अभिमानाने छाती फुलून आली. कित्येकींनी सख्या मैत्रिणीन प्रमाणे एकमेकींना आधार दिला, दिलासा दिला. इतर नात्यान प्रमाणेच इथेही अनेकदा 'अतिपरिचयात अवज्ञा' डोकावली पण काळाने त्यावरही मात केली आहे आणि एकमेकींना आता आमच्यातील गुण-दोषान सहित आम्ही पूर्णपणे स्वीकारले आहे.
या समूहातील सहभागाने मला खूप समृद्ध अनुभव दिले आहेत. समोर न दिसणाऱ्या व्यक्तीला माणूस म्हणून कसे जोखावे याचे शिक्षण याच समूहातून मिळाले. दृष्टीभेत न घडता हि आपला सच्चा व्यवहार समोरील सच्च्या व्यक्तीला किती अचूक भिडतो हा प्रत्यय आला.
आमच्या नवीन कल्पनेचे बीज हि याच समूहात रोवले गेले. 'बोल-सखी' या ऑन-लाईन समूहा ची स्थापना याच तानिश्कातील मैत्रिणींच्या आग्रहा खातर झाली. त्याची पाळे-मुळे रुजून आता अडीच महिने झाले आहेत. तो आता मन मोकळे करण्याचा एक हक्काचा कट्टा बनून गेला आहे. आपल्याला खरेतर किती काय काय बोलायचे असते, पण ते सोडून आपण इतरच काही बाही बोलत राहतो याची जाणीव आता सख्यांना होऊ लागली आहे. बर्याचदा हवे ते न बोलल्याने, खदखदणारा विचार कोणापाशी तरी बोलून न टाकल्याने किंवा आपण करू किंवा बोलू ते चूक कि बरोबर हे न ठरवता आल्याने एकटेपणाची, वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली कि तिचे पडसाद शरीरावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. हा समूह 'तुमच्या समस्यांची तत्काळ उत्तरे' वगैरे अजिबात देत नाही. फक्त आपण एकटे नाहीयोत हि भावना मात्र नक्कीच रुजवतो. समस्या नाकारणे हे उत्तर कधीच नसते, त्याला भिडून त्य्चाशी कसे डील करता येईल याच्या शक्यता तपासून बघायला आपल्या समूहाची नक्कीच मदत मिळू शकते. आणि बायका आश्वस्त झाल्या कि त्या बोलतातच, नव्हे ती त्यांची ताण मुक्त होण्याची गरजच आहे हे या समूहातील पोस्ट्स च दर्शवतात.
या ऑन-लाईन विश्वाने मला वैयक्तिक रित्या एक फ्रेंड फिलोसोफेर आणि गाईड 'मीनल दफ्तरदार' च्या रूपाने दिला आहे. बहुदा देवानेच तिचे माझ्या आयुष्यात येणे, हे माझ्या दोन जवळच्या व्यक्ती हिरावून घेतल्या बद्दल केलेली भरपाई वाटावी असे नियोजित केले असावे. तो आहे आणि कुठले रूप घेऊन कधी प्रकट होईल सांगता येत नाही हेच खरे. गणपती बाप्पा मोरया.