Saturday, March 19, 2011

अणि स्मृति ठेवुनी जाती.............

१९ आणि २० या दोन तारखा,

येतात दर महिन्यात न चुकता,

पण चुकवून जातात हृदयी ठोका,

आठवणीच त्या.... सोडत नाहीत आपला हेका.


वाढदिवस बाबांचा आज अन मंगलमय होळीचा सण,

न उरली मजा ती आता, गेले कायमचे घरपण.

१९ ला गेली सोडून सासू नव्हे आईच,

अवघे ६२ वय झाली थोडी घाईच,

माझे एक ठीक आहे पण नातवंडांचे काय....................................

कुणी काढावी दृष्ट आता, कुणी घालावी पांखर,

कौतुकात चिंब भिजवण्यासाठी कुणी सजवावे मखर.

२० ला गेली सोडून मैत्रीण कसली ती बहीणच,

पुसून गेले कायमचे सोनेरी क्षणांचे ते पानच,

शब्दाविण नेहमीच समजलो एकमेकींची भाषा,

एकीचे दुःख पचवता वाटले आहे अजून अशा,

पण ५ महिन्यातच घातला दैवाने पुनश्च घाला

गेलीस सोडून तुही उरले कोणी नाही मला


कुणाच्या भरवशावर टाकावे घर, कुणा सांगावे गाऱ्हाणे

पोरकेपण हे जीवघेणे, आणू कुठून अवसान पुराणे........आणू कुठून अवसान पुराणे.