Monday, July 25, 2011

सावर रे ..........

सविता,
आज तुझ्या स्मृतीदिनी तुझ्या आठवणींसोबत अजून बराच काही दाटून आलाय मनात.
आज मला माझ्या तमाम मित्रं-परिवाराला खूप काही सांगायचे आहे.
१) सर्वांनी स्वतःला स्वतःतल्या गुण-दोषांसकट स्वीकारा.
२) आपल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करून टाका, म्हणजे प्रायाश्चित्त हि शिक्षा वाटणार नाही.
३) आपली तुलना फक्त स्वतःशीच करा म्हणजे हेवा, मत्सर किंवा अपुरेपणाची भावना तुम्हाला स्पर्श हि करणार नाही.

आज अचानक हे तत्वज्ञान सांगायचे मी काय आरम्भ्लय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मी आत्ता वर जे काही सांगितलं त्यात वेगळं हि काहीच नाही. कुठल्याही स्व-मदत पुस्तकात अथवा अध्यात्मिक प्रवचनात हि असंच काहीसं ऐकायला मिळतं.
तुम्ही म्हणाल आम्हाला या कशाचीच कधीच गरज पडत नाही, आम्ही मुळातच आतून कणखर आहोत. खात्री बाळगा, असं असेल तर माझी काळजीच मिटली. माझ्या आजूबाजूला मला असेच वर्तुळ हवे आहे. पण आपल्या पैकी बरीच जणांना सुदृढ मन जपणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रत्येक ची एक दुखरी नस असतेच. त्यावर फुंकर घालायची प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीतच असतो. पण हल्लीच्या सामाजिक परिस्थितीत या क्षमता आपण गमावून बसलोय. या दुखर्या नसा आपल्या मनावर तर परिणाम करतातच, त्यामुळे आपले शरीर सुद्धा आतून पोखरू लागलेय. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा काहीशा कोंडीत आपण सापडलोय.

तरीही आपली मानसिकता बदलत नाही. खरं तर, तणावाचे पारडे जड झाल्यावर, लगेच तणावमुक्तीच्या पारड्यात आपण भर टाकली पाहिजे. पण आपण तसं न करता दिवस ढकलत राहतो.

१) आपल्या पैकी किती जण, मनाला दुखलं-खुपलं तर लगेच औषधपाणी करतात?
२) फेसबुक आणि ओर्कुट झटदिशी स्वीकारणारे आपण अजूनही नाईलाज आणि शेवटचा उपाय म्हणूनच समुपदेशकाकडे जातो.
३) स्पा थेरपीज नेमाने घेणारे आपण, मानसोपचार थेरपीज घेणे कमीपणाचे का समजतो?
४) एखादा त्या घेत असेल तर अशा माणसाला कुठलातरी शिक्का लावून मोकळे का होतो?

सविता, तू गेल्यावर, मी अशीच सैरभैर झाले.
आईंना जाऊन ५ महिनेच झाले होते.
तुम्ही दोघी होतात तेव्हा जग जिंकल्याच्या नादात असायचे मी.
तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक सोडून गेल्यावर मात्र जाणवले कि आता बाहेरचा आधार शोधायलाच हवा. नाहीतर आपले काही खरे नाही.
सुदैवाने एक पारडे जड झाले तेव्हाच दुसर्या पारड्यात भर घालायची तरतूद सुद्धा देवाने करून ठेवली होती. ती संधी मी घेतली व माझ्या दुसर्या एका मैत्रिणीकडे उर्फ समुपदेशकाकडे गेले. तिच्याशी बोलून मन मोकळे केले, मनात दाटून आलेली भीती तीचाशी शेअर केली. तिने मला कमालीचे आश्वस्त केले.

ह्या माझ्या कौन्सिलर मैत्रिणीचा एक सपोर्ट ग्रुप आहे. ' बोल सखी" नावाचा. ज्यात मीही सहभागी आहे. गेले ६-८ महिने आम्ही दर १५ दिवसांनी, एकत्र येतो. जर कुणा सदस्याला स्वेच्छेने मन मोकळं करायचं असेल तर त्याला प्राधान्य देतो. नंतर भवतालच्या परिस्थितीला अनुसरून एक एक विषय चर्चेला घेतो, ज्यात अनेक दृष्टीकोन समोर येतात, काही उपाय सुचवले जातात आणि एकूणच प्रत्येकीला आपापल्या मानसिक बैठकीचे सर्विसिंग करून घेता येतं.

दोन वर्षांपूर्वी, राजसच्या वर्तव्नुकी बाबत माझा मनात जरा गोंधळ माजला होता. आधी नेट वर सर्च केले पण गोंधळ आणखीनच वाढला. एका प्रसिद्ध लहान मुलांच्या कौन्सिलर कडे गेले, तर तिने आधी खिसा साफ रिकामा केला माझा आणि राजस ला कुठल्या तरी एका गटात वर्गीकरण करून ती चा कडे अस्लेली औषध घ्यायला सांगितली. तिच्या नादी न लागता, मि दुसर्या एका कौंसिलर कडे गेले.
तिथे मात्र माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मला माझे बाळ आणखी नव्याने उलगडले. त्याला कुठल्या हि कॅटेगरीत न बसवता, त्याचे वेगळेपण कसे जपले पाहिजे ते मला समजले. राजस हि त्यांच्या सेशन्स मध्ये खूप रमायचा, परत कधी जाऊया असे विचारायचा.

हे सर्वे सविस्तरपणे सांगायचा उद्देश एवढाच, कि आपल्या पैकी प्रत्येकालाच स्वतःची मदत अशी स्वतःच करायची आहे.
त्या साठी सर्वात आधी एक करा. जर खरोखर एखादा किडा मनात वळवळत असेल तर आधी त्याला सामोरे जा.
प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असे म्हणून प्रोब्लेम्स सुटत नसतात फक्त साठत असतात.

सविता...................तू हे करायला हवे होतेस. nothing in this world is worth risking your life for.

Friday, July 15, 2011

NACH GA GHUMA

नाच ग घुमा' साश्रू नेत्रांनी खाली ठेवलं. इतक्या सार्या भावनांची खळबळ माजलीये कि बस.
एवढ्या मोठ्या चित्र महर्षींची कन्या, पण एवढ्या खडतर अनुभवांना सामोरं जाण का असेल त्यांच्या नशिबात? बरं हे लेकीचं प्राक्तन आधीच जाणून कि काय, आई-बाबांनी तीनही मुलांना गांधीवादी विचारसरणी जपणाऱ्या तपोवनात शिकवलं. सिनेसृष्टीतली छान-चौकि घरात घुसू दिली नाही.तीन बायकांशी लग्न करून तिघींची जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. त्याही बहिणींच्या नात्याने एकमेकींशी वागल्या. मुलांना हि कधी आपल्या-तुपल्या ची सवय लवली नाही.
'हे विश्व ची माझे घर' हेच भालजींच्या स्तुदिओ तील वातावरण. अशा वातावरणात वाढलेल्या आबी मध्ये समर्पणाची भावना खोलवर रुजली. पाहिले लग्न कातकरांशी. १८ वर्षे मनोभावे संसार केला. तीन कन्या पदरी ठेऊन काटकरांनी अल्पशा आजारपणात जगाचा निरोप घेतला. तोवर विधात्याने थोडी का होईना खुंटी बळकट केली होती. संसार आणि मुली वाढवतानाच बी.एड आणि शिक्षिकेची नोकरी आणि नावावर घर हाताशी होतं. ताई गोव्याच्या प्रोपर्तीवर पाणी सोडून आल्या होत्या. आपला हिस्सा कधीच मागितला नव्हता, उलट दुसर्यांची सोय आधी बघितली होती. अजूनही माणसां वरचा विश्वास शाबूत होता.
रणजीत देसाईंची (दादा) भेट आणि नंतर त्यांच्या पत्रांचा सहवास खरतर मनाला पुरेशी उभारी देत होता. त्याहून जास्त मन काही मागत हि नव्ह्तं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दादांना संसार हवा होता. कोवाड च्या घराला सावली देणारं बाई माणूस हवं होतं. ताईन चे मन निर्णय घ्यायला पुरेसे तयार नसतानाही एकतर्फी निर्णय घेऊन दादा मोकळे झाले.
मनातल्या सर्व शंकांचे दादा समाधान करत होते. धीराचे शब्द ऐकवत होते. शब्दांना जंजाळात पकड नार्याचेच शब्द ते. मोह नाही पडला तरच नवल.
ताईंनी पुन्हा 'नाच ग घुमा' चा फेर धरला. दादांच्या मुलींना आपलं मानणा हे बालपणी च्या संस्कारांनी उपजतच शिकवलं होतं. दादा हि सावलीत रमले होते. पण एकरूप होऊन विरघळल्या फक्त माधवी ताई. यथावकाश येत गेलेल्या दुराव्याला कारणीभूत ठरली ती ताईंच्या प्रतिभेची हलकीशी झुळूक. जिला वादळ होऊन दादांच्या प्रतिभेला कधीच टक्कर द्यायची नव्हती., फक्त या आजवरच्या धडपडीत फुटलेल्या धुमारांना वाट मोकळी करायची होती. पण हे दादांना कधी कळलेच नाही. त्यात त्यांचा पिंड सच्च्या कलावंताचा. त्यांच्या प्रतिभेला स्तुती-सुमनांची न निघणारी कवच-कुंडले घट्ट चिकटली होती. त्यांना फसवे अनुयायी खरे भासू लागले व १४ वर्षे निमूट गाजावाजा न करीत आपलं संसार फुलवणाऱ्या व गाव वाड्यात आणून शिक्षीकी पिंड जपू पाहणाऱ्या ताई डोईजड वाटू लागल्या. आजवर ताईंनी आपले मानून जीव ओवाळून टाकलेल्या अप्तेष्टांचीही फूस दादांना लाभते. आणि आता दादान्सकट आपण कुणालाच नको आहोत हि जाणीव होताच ताई हादरतात.
दादांना विनवतात, मळभ दूर करायचा प्रयत्न करतात, पण आता सावली ची गरज संपलेली असते.
या हि वेळी ताईंचा सुकाणू अज्ञात शक्तींनी गच्च धरून ठेवलेला असतो. बेळगाव चे घर नावावर असते. मुलींच्या पंखात बळ येऊन त्या उडालेल्या असतात.
आणि 'नाच ग घुमा' चा फेरा आता मात्र ताईंनी निग्रहाने थांबवलेला असतो.

Friday, July 8, 2011

tumsa nahi dekha

बघावं तेव्हा कुठल्याही गल्लीत दिवसा ढवळ्या शाळकरी मुली आणि त्यांचे 'मित्रं' यांचे चाळे पाहून विटलेल्या माझ्या डोळ्यांना आज एक सुखद धक्का बसला. बरोबर माझ्या खिडकीखाली आत्ताही असेच एक जोडपे उभे आहे. पण इतके संयमी आणि इतके सज्जन जोडपे कि त्यांच्याकडे कौतुकाने पहात राहावे. असतील २५ विशी च्याच घरात. दोघात अंतर सव्वा फुटांचे. ओळख अगदी नवी कोरी दिसतीये, कारण संवादात बर्यापैकी खंड पडतोय. नवीन विषय काढून बोलायला दोघेही उत्सुक, पण उतावीळ अजिबात नाही. दोघेही चांगल्या घरातील बर्यापैकी शिक्षित वाटतायत. पेहराव साधा पण नेटका.गप्पा छान रंगल्यात, दोघं मधून मधून हास्य विनोद सुद्धा करतायत. तो नवीन विषय काय काढायचा ह्या विचारात गुंगलेला असताना, ती हळूच त्याचाकडे पाहून घेते आणि त्याच्या एखाद्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यात ती रंगली, कि तो तिला न्याहालतोय. कुठेही आचरटपणा नाही, फिदीफिदी हसणे नाही, एकमेकांच्या अंगचटीला जाणे नाही. सर्वात मला आवडलंय ते ह्या भेटीगाठीत कुठेही चोरटेपणाचा लवलेश नाही. इतर पोरीन सारखे तिने उगीचच उन्हाचे निमित्त करून तोंड लपवायला पुणेरी स्पेशल स्कार्फ बांधलेला नाही. वाह दिल खुश हो गया...........जियो !!!!!
.