सविता,
आज तुझ्या स्मृतीदिनी तुझ्या आठवणींसोबत अजून बराच काही दाटून आलाय मनात.
आज मला माझ्या तमाम मित्रं-परिवाराला खूप काही सांगायचे आहे.
१) सर्वांनी स्वतःला स्वतःतल्या गुण-दोषांसकट स्वीकारा.
२) आपल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करून टाका, म्हणजे प्रायाश्चित्त हि शिक्षा वाटणार नाही.
३) आपली तुलना फक्त स्वतःशीच करा म्हणजे हेवा, मत्सर किंवा अपुरेपणाची भावना तुम्हाला स्पर्श हि करणार नाही.
आज अचानक हे तत्वज्ञान सांगायचे मी काय आरम्भ्लय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मी आत्ता वर जे काही सांगितलं त्यात वेगळं हि काहीच नाही. कुठल्याही स्व-मदत पुस्तकात अथवा अध्यात्मिक प्रवचनात हि असंच काहीसं ऐकायला मिळतं.
तुम्ही म्हणाल आम्हाला या कशाचीच कधीच गरज पडत नाही, आम्ही मुळातच आतून कणखर आहोत. खात्री बाळगा, असं असेल तर माझी काळजीच मिटली. माझ्या आजूबाजूला मला असेच वर्तुळ हवे आहे. पण आपल्या पैकी बरीच जणांना सुदृढ मन जपणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रत्येक ची एक दुखरी नस असतेच. त्यावर फुंकर घालायची प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीतच असतो. पण हल्लीच्या सामाजिक परिस्थितीत या क्षमता आपण गमावून बसलोय. या दुखर्या नसा आपल्या मनावर तर परिणाम करतातच, त्यामुळे आपले शरीर सुद्धा आतून पोखरू लागलेय. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा काहीशा कोंडीत आपण सापडलोय.
तरीही आपली मानसिकता बदलत नाही. खरं तर, तणावाचे पारडे जड झाल्यावर, लगेच तणावमुक्तीच्या पारड्यात आपण भर टाकली पाहिजे. पण आपण तसं न करता दिवस ढकलत राहतो.
१) आपल्या पैकी किती जण, मनाला दुखलं-खुपलं तर लगेच औषधपाणी करतात?
२) फेसबुक आणि ओर्कुट झटदिशी स्वीकारणारे आपण अजूनही नाईलाज आणि शेवटचा उपाय म्हणूनच समुपदेशकाकडे जातो.
३) स्पा थेरपीज नेमाने घेणारे आपण, मानसोपचार थेरपीज घेणे कमीपणाचे का समजतो?
४) एखादा त्या घेत असेल तर अशा माणसाला कुठलातरी शिक्का लावून मोकळे का होतो?
सविता, तू गेल्यावर, मी अशीच सैरभैर झाले.
आईंना जाऊन ५ महिनेच झाले होते.
तुम्ही दोघी होतात तेव्हा जग जिंकल्याच्या नादात असायचे मी.
तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक सोडून गेल्यावर मात्र जाणवले कि आता बाहेरचा आधार शोधायलाच हवा. नाहीतर आपले काही खरे नाही.
सुदैवाने एक पारडे जड झाले तेव्हाच दुसर्या पारड्यात भर घालायची तरतूद सुद्धा देवाने करून ठेवली होती. ती संधी मी घेतली व माझ्या दुसर्या एका मैत्रिणीकडे उर्फ समुपदेशकाकडे गेले. तिच्याशी बोलून मन मोकळे केले, मनात दाटून आलेली भीती तीचाशी शेअर केली. तिने मला कमालीचे आश्वस्त केले.
ह्या माझ्या कौन्सिलर मैत्रिणीचा एक सपोर्ट ग्रुप आहे. ' बोल सखी" नावाचा. ज्यात मीही सहभागी आहे. गेले ६-८ महिने आम्ही दर १५ दिवसांनी, एकत्र येतो. जर कुणा सदस्याला स्वेच्छेने मन मोकळं करायचं असेल तर त्याला प्राधान्य देतो. नंतर भवतालच्या परिस्थितीला अनुसरून एक एक विषय चर्चेला घेतो, ज्यात अनेक दृष्टीकोन समोर येतात, काही उपाय सुचवले जातात आणि एकूणच प्रत्येकीला आपापल्या मानसिक बैठकीचे सर्विसिंग करून घेता येतं.
दोन वर्षांपूर्वी, राजसच्या वर्तव्नुकी बाबत माझा मनात जरा गोंधळ माजला होता. आधी नेट वर सर्च केले पण गोंधळ आणखीनच वाढला. एका प्रसिद्ध लहान मुलांच्या कौन्सिलर कडे गेले, तर तिने आधी खिसा साफ रिकामा केला माझा आणि राजस ला कुठल्या तरी एका गटात वर्गीकरण करून ती चा कडे अस्लेली औषध घ्यायला सांगितली. तिच्या नादी न लागता, मि दुसर्या एका कौंसिलर कडे गेले.
तिथे मात्र माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मला माझे बाळ आणखी नव्याने उलगडले. त्याला कुठल्या हि कॅटेगरीत न बसवता, त्याचे वेगळेपण कसे जपले पाहिजे ते मला समजले. राजस हि त्यांच्या सेशन्स मध्ये खूप रमायचा, परत कधी जाऊया असे विचारायचा.
हे सर्वे सविस्तरपणे सांगायचा उद्देश एवढाच, कि आपल्या पैकी प्रत्येकालाच स्वतःची मदत अशी स्वतःच करायची आहे.
त्या साठी सर्वात आधी एक करा. जर खरोखर एखादा किडा मनात वळवळत असेल तर आधी त्याला सामोरे जा.
प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असे म्हणून प्रोब्लेम्स सुटत नसतात फक्त साठत असतात.
सविता...................तू हे करायला हवे होतेस. nothing in this world is worth risking your life for.