Friday, July 15, 2011

NACH GA GHUMA

नाच ग घुमा' साश्रू नेत्रांनी खाली ठेवलं. इतक्या सार्या भावनांची खळबळ माजलीये कि बस.
एवढ्या मोठ्या चित्र महर्षींची कन्या, पण एवढ्या खडतर अनुभवांना सामोरं जाण का असेल त्यांच्या नशिबात? बरं हे लेकीचं प्राक्तन आधीच जाणून कि काय, आई-बाबांनी तीनही मुलांना गांधीवादी विचारसरणी जपणाऱ्या तपोवनात शिकवलं. सिनेसृष्टीतली छान-चौकि घरात घुसू दिली नाही.तीन बायकांशी लग्न करून तिघींची जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. त्याही बहिणींच्या नात्याने एकमेकींशी वागल्या. मुलांना हि कधी आपल्या-तुपल्या ची सवय लवली नाही.
'हे विश्व ची माझे घर' हेच भालजींच्या स्तुदिओ तील वातावरण. अशा वातावरणात वाढलेल्या आबी मध्ये समर्पणाची भावना खोलवर रुजली. पाहिले लग्न कातकरांशी. १८ वर्षे मनोभावे संसार केला. तीन कन्या पदरी ठेऊन काटकरांनी अल्पशा आजारपणात जगाचा निरोप घेतला. तोवर विधात्याने थोडी का होईना खुंटी बळकट केली होती. संसार आणि मुली वाढवतानाच बी.एड आणि शिक्षिकेची नोकरी आणि नावावर घर हाताशी होतं. ताई गोव्याच्या प्रोपर्तीवर पाणी सोडून आल्या होत्या. आपला हिस्सा कधीच मागितला नव्हता, उलट दुसर्यांची सोय आधी बघितली होती. अजूनही माणसां वरचा विश्वास शाबूत होता.
रणजीत देसाईंची (दादा) भेट आणि नंतर त्यांच्या पत्रांचा सहवास खरतर मनाला पुरेशी उभारी देत होता. त्याहून जास्त मन काही मागत हि नव्ह्तं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दादांना संसार हवा होता. कोवाड च्या घराला सावली देणारं बाई माणूस हवं होतं. ताईन चे मन निर्णय घ्यायला पुरेसे तयार नसतानाही एकतर्फी निर्णय घेऊन दादा मोकळे झाले.
मनातल्या सर्व शंकांचे दादा समाधान करत होते. धीराचे शब्द ऐकवत होते. शब्दांना जंजाळात पकड नार्याचेच शब्द ते. मोह नाही पडला तरच नवल.
ताईंनी पुन्हा 'नाच ग घुमा' चा फेर धरला. दादांच्या मुलींना आपलं मानणा हे बालपणी च्या संस्कारांनी उपजतच शिकवलं होतं. दादा हि सावलीत रमले होते. पण एकरूप होऊन विरघळल्या फक्त माधवी ताई. यथावकाश येत गेलेल्या दुराव्याला कारणीभूत ठरली ती ताईंच्या प्रतिभेची हलकीशी झुळूक. जिला वादळ होऊन दादांच्या प्रतिभेला कधीच टक्कर द्यायची नव्हती., फक्त या आजवरच्या धडपडीत फुटलेल्या धुमारांना वाट मोकळी करायची होती. पण हे दादांना कधी कळलेच नाही. त्यात त्यांचा पिंड सच्च्या कलावंताचा. त्यांच्या प्रतिभेला स्तुती-सुमनांची न निघणारी कवच-कुंडले घट्ट चिकटली होती. त्यांना फसवे अनुयायी खरे भासू लागले व १४ वर्षे निमूट गाजावाजा न करीत आपलं संसार फुलवणाऱ्या व गाव वाड्यात आणून शिक्षीकी पिंड जपू पाहणाऱ्या ताई डोईजड वाटू लागल्या. आजवर ताईंनी आपले मानून जीव ओवाळून टाकलेल्या अप्तेष्टांचीही फूस दादांना लाभते. आणि आता दादान्सकट आपण कुणालाच नको आहोत हि जाणीव होताच ताई हादरतात.
दादांना विनवतात, मळभ दूर करायचा प्रयत्न करतात, पण आता सावली ची गरज संपलेली असते.
या हि वेळी ताईंचा सुकाणू अज्ञात शक्तींनी गच्च धरून ठेवलेला असतो. बेळगाव चे घर नावावर असते. मुलींच्या पंखात बळ येऊन त्या उडालेल्या असतात.
आणि 'नाच ग घुमा' चा फेरा आता मात्र ताईंनी निग्रहाने थांबवलेला असतो.