Monday, December 19, 2011

पर्व नवे

ऑन-लाईन मैत्री हि या दशकाची एक देणगी आहे यात वाद नाही. या मैत्री मध्ये जितकं थ्रील, वेगळेपण, तितकीच रिस्क सुद्धा. एखादा आश्वासक दुवा सापडला तर मात्र प्रत्यक्ष मैत्री इतकाच आल्हाद दायक अनुभव मिळतो हा माझा अनुभव. आमच्या तनिष्का परिवार बाबत तरी हेच म्हणता येईल.
'तनिष्का' हे सकाळ वृत्तपत्र समूहाचे नवीन मासिक ५ वर्षान पूर्वी हातात आले आणि त्यातील विषय हे नेहमीच्या टिपिकल महिला स्पेशल मासिकान पेक्षा हटके आहेत हे जाणवले. तोवर मासिकान मध्ये सरधोपट अशी दोन टोकं होती. एक बाजूला 'बेहेनजी' प्रकारातील साचेबद्ध घरेलू विषयांना आधुनिकतेची फोडणी पेरलेली, त्यातील कथा या आपल्याशा न वाटणाऱ्या, त्यातील टिप्स वाचून वाचून चोथा झालेल्या, कौटुंबिक प्रश्नोत्तरे हि निव्वळ मासिकाचा खप वाढवा या साठी निर्मिलेली तडक-भडक अशी 'सहेली', 'मैत्रीण',वुमेन'स इरा', मधून डोकावणारी. आणि दुसर्या बाजूला अगदी उच्चभ्रू वर्गाला साजेसे 'फेमिना' गटातील मासिके ज्यात फेशन, मेकप, आणि घरभेदी विचारसरणी चा भडीमार या शिवाय काही नसे.
या दोन्ही टोकाच्या वर्गातील स्त्री मासिकान मध्ये समन्वय साधत मुख्यत्वे वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक जाणिवेचे खाद्य पुरविणारे मासिक म्हणून 'तनिष्का' समोर आले.
आजूबाजूच्या पुरुष प्रधान जगात, लढत,झगडत का होईना पण पण आपले स्थान मागत वावरणाऱ्या , स्व-ओळख असलेल्या आणि त्यामुळेच स्वतंत्र विचारसरणीच्या अश्या स्त्रियांचे खर्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे मासिक म्हणून 'तनिष्का'ने आपली ओळख प्रस्थापित केली आणि आमच्या मनात घर केले.
कालानुरूप या मासिकाने खास 'netizens' पर्यंत हि पोचता यावे या कारणाने ओर्कुट वर 'तनिष्का' नामक ऑन-लाईन समूह चालू केला. त्याची लिंक मासिकावर झळकू लागली. फेसबुक शी अजून मैत्री न झालेल्या पण ओर्कुट वर बर्यापैकी स्थिरावलेल्या माझ्या सारख्या अनेक सख्यांना नवीन लिंक आकर्षित करू लागली. बघूया तरी काय प्रकार आहे या विचाराने सभासदत्व घेतले गेले.
सुरवातीला केवळ मूक वाचक राहणे माझा सारखेच अनेकींनी पसंत केले. त्या काळात इतर सहभागी मेम्बर्स च्या पोस्ट्स वाचणे आणि एकेकीची एकतर्फी पारख करणे चालू असायचे. मग हळू हळू विश्वास दृढ व्हायला लागल्यावर प्रकट होऊन पोस्ट्स टाकणे, नवीन टोपिक्स टाकणे आणि त्यावर चर्चा करणे सुरु झाले. जुन्या जाणत्या मेम्बर्स नीच मग मराठी फोन्ट कसा वापरायचा ते हि शिकवले. आशा तर्हेने सावध पावले टाकीत सुरु झालेला प्रवास मजल-दरमजल करीत वेग घेऊ लागला.
समुहात प्रकट होऊन सहभाग घेणाऱ्या सख्या दूरवर पसरलेल्या आहेत. यु.एस, सिंगापोर, ओमान, युके, मधून तर आहेतच पण महाराष्ट्रात देखील जयसिंगपूर, फलटण, कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे सांगली, सातारा, रत्नागिरी ,सोलापूर आणि भारतभर देखील उज्जैन, हैदराबाद येथे हि आहेत. पण असे लक्षात आले कि पुण्यातील सख्या मेजोरीटी मध्ये आहेत आणि समूहाची समन्वयक आणि सर्वेसर्वा मंजिरी फडणीस हिच्या शी बोलून एक कल्पना सुचली.
आजवर केवळ ऑन-लाईन भेटलेल्या पण एव्हाना एकमेकींना पुरेपूर ओळखलेल्या मेम्बर्स चे पुण्यात सारसबागे मध्ये पाहिले गेट-टुगेदर ठरले. त्यात शहरातील व चिंचवड, कल्याण,फलटण आणि जय्सिंपूर हून देखील सख्या आल्या होत्या. समोरासमोर आल्यानंतर खरेतर पहिल्यांदा भेटल्याचा फील आम्हाला कोणालाच आला नाही, तरीही आमची ओळख आणि मैत्री वर्चुअल जगातून वास्तवात दृढ झाल्याचा आनंद काही औरच होता हे निश्चित.
त्या नंतर आजवर अनेक गेट-तुगेदर्स झाली, कधी संभाजी बागेत कधी सारस बागेत तर दोन तीनदा पानशेत मधील सूर्य शिबिरात हि सहली झाल्या.
मंजिरी फडणीस ने आजवरच्या एकूण एक नाही पण जास्तीत जास्त गेट-तुगेदर्स मध्ये नुसती हजेरीच नाही तर वेळ काढून सहभाग घेतला आणि ऑन-लाईन नव-नवीन विषय काढून आम्हाला प्रतिक्रिया द्यायला, लिहायला उद्युक्त करून अनेकदा मासिका मध्ये आमची नावेही छापून आणली. अनेकींचे छंद, त्यातून त्यांनी केलेले अर्थार्जन कधी समाजकार्य समोर आले. अनेकींच्या कौतुकाने, अभिमानाने छाती फुलून आली. कित्येकींनी सख्या मैत्रिणीन प्रमाणे एकमेकींना आधार दिला, दिलासा दिला. इतर नात्यान प्रमाणेच इथेही अनेकदा 'अतिपरिचयात अवज्ञा' डोकावली पण काळाने त्यावरही मात केली आहे आणि एकमेकींना आता आमच्यातील गुण-दोषान सहित आम्ही पूर्णपणे स्वीकारले आहे.
या समूहातील सहभागाने मला खूप समृद्ध अनुभव दिले आहेत. समोर न दिसणाऱ्या व्यक्तीला माणूस म्हणून कसे जोखावे याचे शिक्षण याच समूहातून मिळाले. दृष्टीभेत न घडता हि आपला सच्चा व्यवहार समोरील सच्च्या व्यक्तीला किती अचूक भिडतो हा प्रत्यय आला.
आमच्या नवीन कल्पनेचे बीज हि याच समूहात रोवले गेले. 'बोल-सखी' या ऑन-लाईन समूहा ची स्थापना याच तानिश्कातील मैत्रिणींच्या आग्रहा खातर झाली. त्याची पाळे-मुळे रुजून आता अडीच महिने झाले आहेत. तो आता मन मोकळे करण्याचा एक हक्काचा कट्टा बनून गेला आहे. आपल्याला खरेतर किती काय काय बोलायचे असते, पण ते सोडून आपण इतरच काही बाही बोलत राहतो याची जाणीव आता सख्यांना होऊ लागली आहे. बर्याचदा हवे ते न बोलल्याने, खदखदणारा विचार कोणापाशी तरी बोलून न टाकल्याने किंवा आपण करू किंवा बोलू ते चूक कि बरोबर हे न ठरवता आल्याने एकटेपणाची, वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली कि तिचे पडसाद शरीरावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. हा समूह 'तुमच्या समस्यांची तत्काळ उत्तरे' वगैरे अजिबात देत नाही. फक्त आपण एकटे नाहीयोत हि भावना मात्र नक्कीच रुजवतो. समस्या नाकारणे हे उत्तर कधीच नसते, त्याला भिडून त्य्चाशी कसे डील करता येईल याच्या शक्यता तपासून बघायला आपल्या समूहाची नक्कीच मदत मिळू शकते. आणि बायका आश्वस्त झाल्या कि त्या बोलतातच, नव्हे ती त्यांची ताण मुक्त होण्याची गरजच आहे हे या समूहातील पोस्ट्स च दर्शवतात.
या ऑन-लाईन विश्वाने मला वैयक्तिक रित्या एक फ्रेंड फिलोसोफेर आणि गाईड 'मीनल दफ्तरदार' च्या रूपाने दिला आहे. बहुदा देवानेच तिचे माझ्या आयुष्यात येणे, हे माझ्या दोन जवळच्या व्यक्ती हिरावून घेतल्या बद्दल केलेली भरपाई वाटावी असे नियोजित केले असावे. तो आहे आणि कुठले रूप घेऊन कधी प्रकट होईल सांगता येत नाही हेच खरे. गणपती बाप्पा मोरया.

Friday, August 12, 2011

The big Question......................

तू काय करतेस? जॉब कि घरीच ?
विचारणार्याच्या तोंडाचे वळण आपण बदलू शकत नाही.
पण उत्तर देणाऱ्या गृहिणीने जर " मी घरीच असते" म्हटले तर मात्र तिच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते.
हा ' च ' च आहे आपला सर्वात मोठा शत्रू.
This letter is solely responsible for the downmarket status of house- ( wives, mothers)
Can't we just say- " मी घरी असते."
At least I say so assertively. Why do some of us judge themselves and others by our earning capacity?

गृहिणी जर येन केन प्रकारे घरात दमडी आणत असेल तर(च) तिच्या गृहिणी पदाला शोभा येते का?

Well, I have utmost respect for such ladies. Most of them are my friends.
यातल्या किती तरी जणी आपल्या अंगभूत गुणांनी लक्ष्मी घरात आणतात. उत्तम salesmanship skills हि त्यांची जमेची बाजू.
They may be those getting sarees, dress materials from Chennai, Baroda,Delhi, Banares and such far away places and putting up stalls or retailing them through their homes. The others do it by setting up Tupperware, Oriflame and other such agencies.

Some couple their salesmanship skills with some in-born artistic flair. It could then be cookery, drawing, craft, embroidery and other such classes. They are superwomen in the true sense.
काहींना शिकवण्या घेण्याचीही कला अवगत असते, त्यामुळेच हल्ली बालवाडी पासून व्यक्तिमत्व विकास शिबिर आजूबाजूला दिसतात.

Although I do not belong to this earning category, I still vehemently refuse to include this (च) in my biodata.
I may not possess these salesmanship skills, nor do I get any royalty for my writing abilities. I make sure this does not affect my self-esteem in any way. Neither do I harbour any feelings of guilt, nor do I let anyone take me for granted.
Of course I am more flexible and more easily available for my family but I make sure no one takes undue advantage of my status.
I am also lucky to have like-minded people around me.
मी काय करते यावर माझ्या जवळच्या स्नेहींचा स्नेह अजिबात अवलंबून नाही.

पण याहून निराळा विचार करणाऱ्यांची जगात अजिबात कमतरता नाही. कधी कधी " स्वतःला पैशात(च) मोजणाऱ्या " बायका भेटतात. मला हा अति महत्वाचा प्रश्न विचारतात आणि माझ्या कडून अपराधीपणा ची अपेक्षा करतात. आणि माझे उत्तर ऐकून स्वतःचा हिरमोड करून घेतात. काही जणी पुन्हा विचारत नाहीत, पण काही पुन्हा पुन्हा विचारातच राहतात, आता तर माझ्यासाठी त्यांची ओळख हीच झालीये.
Well, I take them all with a pinch of salt and prefer to keep this attitude intact.

तर या (च) ने असं काय मोठा फरक पडतो, या गैरसमजात जगणं आपण सोडून देऊया. Exclude it and experience how it works wonders for your status.

जाता जाता....... लहानपणी बाबांनी सांगितलेला एक किस्सा आठवला.
जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी, आचार्य अत्र्यांना एकदा विचारले," संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ठीके. पण दर वेळी घोषणा देताना ' संयुक्त महाराष्ट्र झाला(च) पाहिजे म्हणायची काय गरज आहे? नुसतं झाला पाहिजे म्हटल्याने काय तो व्हयचा थांबणार आहे का?"
तेव्हा अत्र्यांनी त्यांना अतिशय समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले," साहेब, तुम्ही म्हणता ते चूक नाही, पण कल्पना करा तुमच्या नावातून सुद्धा 'च' (व्हान) काढला तर असा काय फरक पडणारे ? " साहेब गपगार झाले हे वेगळे सांगायला नकोच.
तर अशी हि 'च' ची महती.

Monday, July 25, 2011

सावर रे ..........

सविता,
आज तुझ्या स्मृतीदिनी तुझ्या आठवणींसोबत अजून बराच काही दाटून आलाय मनात.
आज मला माझ्या तमाम मित्रं-परिवाराला खूप काही सांगायचे आहे.
१) सर्वांनी स्वतःला स्वतःतल्या गुण-दोषांसकट स्वीकारा.
२) आपल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करून टाका, म्हणजे प्रायाश्चित्त हि शिक्षा वाटणार नाही.
३) आपली तुलना फक्त स्वतःशीच करा म्हणजे हेवा, मत्सर किंवा अपुरेपणाची भावना तुम्हाला स्पर्श हि करणार नाही.

आज अचानक हे तत्वज्ञान सांगायचे मी काय आरम्भ्लय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मी आत्ता वर जे काही सांगितलं त्यात वेगळं हि काहीच नाही. कुठल्याही स्व-मदत पुस्तकात अथवा अध्यात्मिक प्रवचनात हि असंच काहीसं ऐकायला मिळतं.
तुम्ही म्हणाल आम्हाला या कशाचीच कधीच गरज पडत नाही, आम्ही मुळातच आतून कणखर आहोत. खात्री बाळगा, असं असेल तर माझी काळजीच मिटली. माझ्या आजूबाजूला मला असेच वर्तुळ हवे आहे. पण आपल्या पैकी बरीच जणांना सुदृढ मन जपणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रत्येक ची एक दुखरी नस असतेच. त्यावर फुंकर घालायची प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीतच असतो. पण हल्लीच्या सामाजिक परिस्थितीत या क्षमता आपण गमावून बसलोय. या दुखर्या नसा आपल्या मनावर तर परिणाम करतातच, त्यामुळे आपले शरीर सुद्धा आतून पोखरू लागलेय. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा काहीशा कोंडीत आपण सापडलोय.

तरीही आपली मानसिकता बदलत नाही. खरं तर, तणावाचे पारडे जड झाल्यावर, लगेच तणावमुक्तीच्या पारड्यात आपण भर टाकली पाहिजे. पण आपण तसं न करता दिवस ढकलत राहतो.

१) आपल्या पैकी किती जण, मनाला दुखलं-खुपलं तर लगेच औषधपाणी करतात?
२) फेसबुक आणि ओर्कुट झटदिशी स्वीकारणारे आपण अजूनही नाईलाज आणि शेवटचा उपाय म्हणूनच समुपदेशकाकडे जातो.
३) स्पा थेरपीज नेमाने घेणारे आपण, मानसोपचार थेरपीज घेणे कमीपणाचे का समजतो?
४) एखादा त्या घेत असेल तर अशा माणसाला कुठलातरी शिक्का लावून मोकळे का होतो?

सविता, तू गेल्यावर, मी अशीच सैरभैर झाले.
आईंना जाऊन ५ महिनेच झाले होते.
तुम्ही दोघी होतात तेव्हा जग जिंकल्याच्या नादात असायचे मी.
तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक सोडून गेल्यावर मात्र जाणवले कि आता बाहेरचा आधार शोधायलाच हवा. नाहीतर आपले काही खरे नाही.
सुदैवाने एक पारडे जड झाले तेव्हाच दुसर्या पारड्यात भर घालायची तरतूद सुद्धा देवाने करून ठेवली होती. ती संधी मी घेतली व माझ्या दुसर्या एका मैत्रिणीकडे उर्फ समुपदेशकाकडे गेले. तिच्याशी बोलून मन मोकळे केले, मनात दाटून आलेली भीती तीचाशी शेअर केली. तिने मला कमालीचे आश्वस्त केले.

ह्या माझ्या कौन्सिलर मैत्रिणीचा एक सपोर्ट ग्रुप आहे. ' बोल सखी" नावाचा. ज्यात मीही सहभागी आहे. गेले ६-८ महिने आम्ही दर १५ दिवसांनी, एकत्र येतो. जर कुणा सदस्याला स्वेच्छेने मन मोकळं करायचं असेल तर त्याला प्राधान्य देतो. नंतर भवतालच्या परिस्थितीला अनुसरून एक एक विषय चर्चेला घेतो, ज्यात अनेक दृष्टीकोन समोर येतात, काही उपाय सुचवले जातात आणि एकूणच प्रत्येकीला आपापल्या मानसिक बैठकीचे सर्विसिंग करून घेता येतं.

दोन वर्षांपूर्वी, राजसच्या वर्तव्नुकी बाबत माझा मनात जरा गोंधळ माजला होता. आधी नेट वर सर्च केले पण गोंधळ आणखीनच वाढला. एका प्रसिद्ध लहान मुलांच्या कौन्सिलर कडे गेले, तर तिने आधी खिसा साफ रिकामा केला माझा आणि राजस ला कुठल्या तरी एका गटात वर्गीकरण करून ती चा कडे अस्लेली औषध घ्यायला सांगितली. तिच्या नादी न लागता, मि दुसर्या एका कौंसिलर कडे गेले.
तिथे मात्र माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मला माझे बाळ आणखी नव्याने उलगडले. त्याला कुठल्या हि कॅटेगरीत न बसवता, त्याचे वेगळेपण कसे जपले पाहिजे ते मला समजले. राजस हि त्यांच्या सेशन्स मध्ये खूप रमायचा, परत कधी जाऊया असे विचारायचा.

हे सर्वे सविस्तरपणे सांगायचा उद्देश एवढाच, कि आपल्या पैकी प्रत्येकालाच स्वतःची मदत अशी स्वतःच करायची आहे.
त्या साठी सर्वात आधी एक करा. जर खरोखर एखादा किडा मनात वळवळत असेल तर आधी त्याला सामोरे जा.
प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असे म्हणून प्रोब्लेम्स सुटत नसतात फक्त साठत असतात.

सविता...................तू हे करायला हवे होतेस. nothing in this world is worth risking your life for.

Friday, July 15, 2011

NACH GA GHUMA

नाच ग घुमा' साश्रू नेत्रांनी खाली ठेवलं. इतक्या सार्या भावनांची खळबळ माजलीये कि बस.
एवढ्या मोठ्या चित्र महर्षींची कन्या, पण एवढ्या खडतर अनुभवांना सामोरं जाण का असेल त्यांच्या नशिबात? बरं हे लेकीचं प्राक्तन आधीच जाणून कि काय, आई-बाबांनी तीनही मुलांना गांधीवादी विचारसरणी जपणाऱ्या तपोवनात शिकवलं. सिनेसृष्टीतली छान-चौकि घरात घुसू दिली नाही.तीन बायकांशी लग्न करून तिघींची जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. त्याही बहिणींच्या नात्याने एकमेकींशी वागल्या. मुलांना हि कधी आपल्या-तुपल्या ची सवय लवली नाही.
'हे विश्व ची माझे घर' हेच भालजींच्या स्तुदिओ तील वातावरण. अशा वातावरणात वाढलेल्या आबी मध्ये समर्पणाची भावना खोलवर रुजली. पाहिले लग्न कातकरांशी. १८ वर्षे मनोभावे संसार केला. तीन कन्या पदरी ठेऊन काटकरांनी अल्पशा आजारपणात जगाचा निरोप घेतला. तोवर विधात्याने थोडी का होईना खुंटी बळकट केली होती. संसार आणि मुली वाढवतानाच बी.एड आणि शिक्षिकेची नोकरी आणि नावावर घर हाताशी होतं. ताई गोव्याच्या प्रोपर्तीवर पाणी सोडून आल्या होत्या. आपला हिस्सा कधीच मागितला नव्हता, उलट दुसर्यांची सोय आधी बघितली होती. अजूनही माणसां वरचा विश्वास शाबूत होता.
रणजीत देसाईंची (दादा) भेट आणि नंतर त्यांच्या पत्रांचा सहवास खरतर मनाला पुरेशी उभारी देत होता. त्याहून जास्त मन काही मागत हि नव्ह्तं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दादांना संसार हवा होता. कोवाड च्या घराला सावली देणारं बाई माणूस हवं होतं. ताईन चे मन निर्णय घ्यायला पुरेसे तयार नसतानाही एकतर्फी निर्णय घेऊन दादा मोकळे झाले.
मनातल्या सर्व शंकांचे दादा समाधान करत होते. धीराचे शब्द ऐकवत होते. शब्दांना जंजाळात पकड नार्याचेच शब्द ते. मोह नाही पडला तरच नवल.
ताईंनी पुन्हा 'नाच ग घुमा' चा फेर धरला. दादांच्या मुलींना आपलं मानणा हे बालपणी च्या संस्कारांनी उपजतच शिकवलं होतं. दादा हि सावलीत रमले होते. पण एकरूप होऊन विरघळल्या फक्त माधवी ताई. यथावकाश येत गेलेल्या दुराव्याला कारणीभूत ठरली ती ताईंच्या प्रतिभेची हलकीशी झुळूक. जिला वादळ होऊन दादांच्या प्रतिभेला कधीच टक्कर द्यायची नव्हती., फक्त या आजवरच्या धडपडीत फुटलेल्या धुमारांना वाट मोकळी करायची होती. पण हे दादांना कधी कळलेच नाही. त्यात त्यांचा पिंड सच्च्या कलावंताचा. त्यांच्या प्रतिभेला स्तुती-सुमनांची न निघणारी कवच-कुंडले घट्ट चिकटली होती. त्यांना फसवे अनुयायी खरे भासू लागले व १४ वर्षे निमूट गाजावाजा न करीत आपलं संसार फुलवणाऱ्या व गाव वाड्यात आणून शिक्षीकी पिंड जपू पाहणाऱ्या ताई डोईजड वाटू लागल्या. आजवर ताईंनी आपले मानून जीव ओवाळून टाकलेल्या अप्तेष्टांचीही फूस दादांना लाभते. आणि आता दादान्सकट आपण कुणालाच नको आहोत हि जाणीव होताच ताई हादरतात.
दादांना विनवतात, मळभ दूर करायचा प्रयत्न करतात, पण आता सावली ची गरज संपलेली असते.
या हि वेळी ताईंचा सुकाणू अज्ञात शक्तींनी गच्च धरून ठेवलेला असतो. बेळगाव चे घर नावावर असते. मुलींच्या पंखात बळ येऊन त्या उडालेल्या असतात.
आणि 'नाच ग घुमा' चा फेरा आता मात्र ताईंनी निग्रहाने थांबवलेला असतो.

Friday, July 8, 2011

tumsa nahi dekha

बघावं तेव्हा कुठल्याही गल्लीत दिवसा ढवळ्या शाळकरी मुली आणि त्यांचे 'मित्रं' यांचे चाळे पाहून विटलेल्या माझ्या डोळ्यांना आज एक सुखद धक्का बसला. बरोबर माझ्या खिडकीखाली आत्ताही असेच एक जोडपे उभे आहे. पण इतके संयमी आणि इतके सज्जन जोडपे कि त्यांच्याकडे कौतुकाने पहात राहावे. असतील २५ विशी च्याच घरात. दोघात अंतर सव्वा फुटांचे. ओळख अगदी नवी कोरी दिसतीये, कारण संवादात बर्यापैकी खंड पडतोय. नवीन विषय काढून बोलायला दोघेही उत्सुक, पण उतावीळ अजिबात नाही. दोघेही चांगल्या घरातील बर्यापैकी शिक्षित वाटतायत. पेहराव साधा पण नेटका.गप्पा छान रंगल्यात, दोघं मधून मधून हास्य विनोद सुद्धा करतायत. तो नवीन विषय काय काढायचा ह्या विचारात गुंगलेला असताना, ती हळूच त्याचाकडे पाहून घेते आणि त्याच्या एखाद्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यात ती रंगली, कि तो तिला न्याहालतोय. कुठेही आचरटपणा नाही, फिदीफिदी हसणे नाही, एकमेकांच्या अंगचटीला जाणे नाही. सर्वात मला आवडलंय ते ह्या भेटीगाठीत कुठेही चोरटेपणाचा लवलेश नाही. इतर पोरीन सारखे तिने उगीचच उन्हाचे निमित्त करून तोंड लपवायला पुणेरी स्पेशल स्कार्फ बांधलेला नाही. वाह दिल खुश हो गया...........जियो !!!!!
.

Saturday, June 4, 2011

अवघड आहे.................

'to err is human ' हि खूपच प्रचलित अशी इंग्रजी म्हण आहे. त्यानुसार माणूस हा चुका करणारा प्राणी आहे हे समजते. त्या चुका जर सुधारता आल्या तर त्याला प्रगतीपथावर नेतात, आणि वाढवल्या तर त्याला विनाशा कडे नेतात. हे काही माणसाला आज उमगलेले सत्य नाही, तर पिढ्यानपिढ्या घडत आलेली गोष्ट आहे. तरीही आपल्या आजूबाजूला माणसे चुका करीतच असतात, आणि हि मालिका अव्याहतपणे चालूच राहते.
आज जी गोष्ट मी सांगणारे ती अशीच एका वाट चुकलेल्या माणसाची आहे.
तर हा आपला चारचौघांसारखा नाकासमोरून चालणारा उदय. भरलेल्या घरात, ऐश्वर्यात आणि लाडात वाढलेला असा उदय. धाकटे अपत्य आई-वडिलांच्या विशेष मर्जीतील असते असे म्हणतात, त्यात आपला उदय तर जुळ्या तील वाचलेला म्हणून अजूनच खास. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणेच आई-वडील आणि मोठा भाऊ या सर्वांपेक्षा जरा निराळ्या, शांत स्वभावाचा, काहीसा अबोल पण कळी खुलल्यावर मस्त कोट्या करून सर्वांना हसवणारा असा उदय.
अबोल स्वभावाचा असूनही त्यामानाने उदय ने बर्यापैकी मित्रं अवतीभवती जमवलेले. कोमर्स घेऊन सी ए करायचा त्याचा मानस होता. आर्टिकलशिप च्या वर्षान मध्ये असताना त्याचे वर्तुळ आपसूक वाढत गेले. त्या वर्तुळात चक्क एका मुलीचा, तीही गुजराथी मुलीचा समावेश झाला. ती दोघं वरचेवर एकत्र हिंडू-फिरू लागली आणि थोड्याच अवधीत त्यांची मैत्री बर्यापैकी घनिष्ठ झाली. या गोष्टींनी घरच्या- दारच्या लोकांच्या भुवया ना उंचावत तरच नवल. उदय च्या आईने तसे विचारल्यावर त्याने सर्व हसण्यावारी नेले. पण आपल्या मुलातील हा बदल तिला जाणवल्याशिवाय राहिला नाही.
उदय ची वाहिनी जवळपास त्याच्याच वयाची.तिची आणि ह्या गुजराती मैत्रिणीची पटकन मैत्री जमली. तशी होतीच उर्मिला. गुजराथी असूनही मोडके-तोडके मराठी सुद्धा बोलत असे. कुणीही पटकन ओळख करून घ्यावा असा हसरा आणि बोलका होता तिचा चेहरा. डोळे मिचमिचे, हनुवटी निमुळती, चुणचुणीत आणि स्मार्ट अशी उर्मिला उदय च्या वाहिनीलाही आवडली. उदय,उर्मिला,वाहिनी आणि वहिनीची एक जिवलग मैत्रीण अशी चौकडी वारंवार एकत्र मिळून सिनेमा आणि हॉटेलिंग करत असत. एव्हाना दोघांचे गुपित वाहिनीला कळले होते. तिने त्यावरून उर्मिलाला छेडले हि होते. वाहिनी सारखी विचारायची तिला," बाई ग, घरून काय सांगून येतेस तू इथे? माहित्येय का त्यांना आमच्या उदय बद्दल? एकदा त्यालाही घरी बोलाव तुझ्या." त्यावर उर्मिला कानावर हात ठेऊन म्हणे," काही तरी काय वाहिनी, माझ्या घरचे खूपच कर्मठ आहेत. घरी बिरी नेला ना उदय ला तर माझे CA वगैरे सगळं बंद पडेल."

वाहिनीने त्यावेळी इतके मनावर घेतले नाही. तिला वाटले , जाऊदे , पोर इतकी मायाळू आहे आणि लाघवी आहे, इतकी आपल्यात मिळून मिसळून वागते, मोठ्या पासून लहानांपर्यंत सगळ्यांशी वागायची रीत माहिती आहे, अजून काय हवं? मग यथावकाश उदय आणि उर्मिला ची आर्टिकल-शिप संपली. दोघांना हि त्याच फार्म मध्ये ट्रेनी म्हणून सामावून घेतले आणि एकीकडे त्यांचे CA चे atempts देणे चालू होते. आता अभ्यास निमित्त उर्मिला वरचेवर उदय च्या घरीच पडीक राहू लागली. दोघेही उदय च्या खोलीत तासंतास बसून असत. इथवर सगळं ठीक होतं. पण हळू हळू जेव्हा त्यांनी खोलीचे दार बंद करायला सुरवात केली, तेव्हा वाहिनीला ते खटकायला लागले. तिने अनेक वेळा हि गोष्ट आपल्या सासूला म्हणजे उदयच्या आईला सांगून पहिली. पण कोणीच फारसे मनावर घेतले नाही. उदय चे बाबाही एरवी एवढे कडक पण ते हि सर्व कसे काय खपवून घेत ते वाहिनीला समजत नसे.
पुढे-पुढे घरातल्या सर्व सण-समारंभ, कार्यक्रमांना आणि पाहुण्यांसमोर देखील उदय ची खास मैत्रीण अशीच उर्मिला ची ओळख होऊ लागली. अगदी वाहिनीच्या माहेरच्या गोतावळ्यात हि तिची उपस्थिती लोकांना दिसू लागली.

पण एकदाही पट्ठी ने आपल्या घरी, किंवा समाजात किंवा आपल्या वस्तीच्या आसपास देखील उदय ला फिरकू दिले नव्हते. ते दोघे ऑफिस कलीग्स आहेत एवढेच तिच्या घरी माहित होते. हे सर्व आता वाहिनीला उदयच्या काळजीपोटी चांगलेच खटकायला लागले. उदय चा दादा हि आपल्या आईला ह्या सर्वाचा एकदाचा सोक्ष मोक्ष करायचा लकडा लावू लागला. मग उदय च्या आईने उर्मिला ला निक्षून सांगितले कि बाई आता काय तो एकदाचा निर्णय घे आणि तुझ्या घरच्यांचा कल बघ. नाहीतर फार पुढे जाण्यात काही अर्थ नाही.
प्रकरण गळ्याशी आल्यावर तिचा नाईलाज झाला आणि तिला घरी सांगावच लागलं. तिच्या अपेक्षेनुसार घरी वादळ उठलं. तिच्या आई-बाबांना समाजा बाहेरचा मुलगा मान्यच नव्हता. मग तिची आई आणि मावशी एकदा उदय च्या आई-बाबांना भेटायला आले, ते हि ना सांगता, अचानक.
त्या दिवशी वाहिनीचे डोहाळेजेवण दणक्यात साजरे झाले होते. मंडळी नुकतीच दुपारी आडवी झाली होती. आणि दारात उर्मिला ला घेऊन तिची मावशी आणि आई हजर. सुरवातीलाच त्यांनी सांगितले कि हे प्रकरण इथेच थांबवावे लागेल, कारण उर्मिला चे बाबा कधीच तयार व्हायचे नाहीत. मग उदय च्या दादाने त्यांना सुनावले कि इतका विरोध आहे हे माहित होतं ना उर्मिला ला, तर मग एवढी पुढे गेलीच कशी तुमची मुलगी? मग परस्पर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि शेवटी या प्रकरणावर एकदाचा पडदा पडला.

झाले त्यात नवल नव्हते. उदय ला एका चाणाक्ष मुलीकडून व्यवस्थित वापरले गेले होते. उर्मिला च्या लोभस मुखवट्या आड एक मतलबी, खुशालचेंडू आणि स्वार्थी चेहरा दडला होता. ३-४ वर्ष एका चांगल्या सधन, सुशिक्षित घरातील अत्यंत सालस आणि निरुपद्रवी मुलाला, जमतंय तोवर खेळवून शेवटी आपली प्रतिमा आपल्या समाजात स्वच्छ ठेवण्यात उर्मिला यशस्वी झाली होती. उदय च्या आई-बाबा ना हे छक्के- पंजे कुठे समजणार. पण त्यांनी सुद्धा जर वेळीच उदय ला लगाम घातला असता, तर उर्मिला ने एवढी मजल मारलीच नसती. पण आपल्या समाजात चरित्र बघतात ते मुलीचेच. मुलगा कुठेही शेण खावो, तो परत उजळ माथ्यानेच मिरवतो. हाच कित्ता उदयच्या बाबांनी गिरवला आणि एका शब्दाने आपल्या मुलाला जाब विचारला नाही. उलट हा विषयच आता घरातून बाद झाला.
उदय ने ट्रेनी जॉब सोडला आणि taxation चा पुढचा एक कोर्स केला. मध्ये मध्ये CA चे attempts देणे चालूच होता. पण त्यात म्हणावे तेवढे यश त्याला मिळत नव्हते. अशात दोन वर्ष सरली. आणि आता उदय चे आई-बाबा त्याच्या लग्नाचं बघायच्या मागे लागले. आधी उदय ने लक्ष दिले नाही, आत्ता नको मग बघू, करत टाळत राहिला. पण आईने हळू हळू त्याला तयार केलेच. मग शेवटी हो-नाही करत उदय ने एका वधू-वर सूचक संकेत स्थळावर नाव नोंदवले.
संकेत स्थळावरील नवी पद्धत उदय ला भलतीच रुचली. त्यामधूनच एका मुलीचे प्रोफाईल त्याच्या पाहण्यात आले. तिने त्याला आणि त्याने तिला सिलेक्ट केले. आणि च्याट वर दोघे एकमेकांशी बोलू लागले. पोरगा आयुष्याकडे नव्याने बघू लागलाय ह्याचे समाधान आई बाबांना वाटू लागले. पण त्यांनी मागल्या अनुभवावरून, पुन्हा उदयच्या हातून काही कामी जास्त होऊ नये ह्यासाठी तरी, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन वेळप्रसंगी त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे ना आणि त्यापासून तो सावधगिरी बाळगतो आहे ना, हे तरी तपासून पाहायला हेवे होते. आपला मुलगा एकदा ठेचकाळून सावरलाय, आताही कदाचित त्याचे फासे उलटे पडू शकतील, आपण जातीने त्याच्या उलाढाली तपासून पाहिल्या पाहिजेत , अशी कुठलीही खबरदारी या हि वेळी उदय च्या आई-बाबांनी घेतली नाही.
आणि एके दिवशी आपण च्याट करीत असलेल्या मुलीचे च स्थळ पहायचे असे उदय ने घरी जाहीर केले. इथवर हि ठीकच होते. पण घरी भेटण्यापूर्वी मुलीने उदय ला आधी परस्पर बाहेर हॉटेल मध्ये भेटायला बोलावले. हे हि काही वावगे नव्हते . पण त्यापूर्वी आपल्या मुलाचे कमकुवत व्यक्तिमत्व डोळ्यापुढे ठेऊन, त्याला जबाबदारीच्या समजुतीच्या ४ गोष्टी सांगून अथवा त्याच्या बरोबर कुणी पारखी नजरेचा सोबती पाठवले असते तर पुढे घडलेले रामायण कदाचित टळले असते.
पण म्हणतात ना.........विनाशकाले विपरीत बुद्धी.....
उदय जसा जोशात मुलीला भेटायला गेला त्याहून दुप्पट जोशात पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेत तो परत आला. आणि आल्यावर आईला म्हणाला," अग, मुलगी म्हणजे वैदेही ओळखीतालीच आहे आपल्या. आपल्या बाबांचे ते डॉक्टर मित्रं नाहीत का लुकतुके, ६० व्या वर्षी गेले ते? त्यांची सख्खी पुतणीच हि. एक मोठी बहिण आहे. ती आणि तिचा नवरा मुले बंगलोर ला असतात. भाऊ हिच्याहून एखाद-दीड वर्षांनी मोठा म्हणजे माझ्याच एवढा असेल. आणि आई-वडील आणि आज्जी असे कुटुंब. वरच्या मजल्यावर तिच्या विधवा काकू राहतात.
उदय तर संमोहित झाल्यासारखाच वागत होता. त्याचे आई-बाबा सुद्धा, मुलगी लुकतुके डॉक्टरांची पुतणी असे कळल्यावर पूर्णपणे निर्धास्त झाले होते. डॉक्टरांचा आणि उदय च्या बाबांचा जुना स्नेह. डॉक्टरांचे नाव मोठे आणि घर हि एकत्र पद्धतीचे. अगदी वैदेहीच्या आजी-आजोबांपासून हे घराणे बाबांना परिचित होते. बहिण भावंडांच्या भरल्या घरात वाढलेली, आणि एकत्र कुटुंबाची सवय असलेली मुलगी म्हटल्यावर उदयचे आई-बाबा आणखीनच निश्चिंत झाले. बघण्याचा कार्यक्रम नाममात्रच झाला, आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना आपला होकार कळवला.
पण दादा-वाहिनी खेरीज कुणीही वैदेही कडे नुसते व्यक्ती म्हणून पहिलेच नाही. जर पाहिले असते तर त्यांचे हि मत दादा-वाहिनी सारखेच झाले असते. दादा-वाहिनी ला वैदेही पाहिल्या भेटीपासूनच अजिबात रुचली नाही. एकतर कृष शरीरयष्टी च्या आपल्या भावाला एवढ्या स्थूल ठेवणीची वधू कितपत शोभेल हा पहिला प्रश्न दादाला पडला. एकवेळ बाह्य रूप जरी बाजूला ठेवले तरी तिची बेफिकीर उर्मट नजर, ताठ्याने भरलेली बॉडी लँग्वेज वाहिनीच्या नजरेतून सुटली नाही. वाहिनीने किंचित नाराजी व्यक्त करताच उदय ने तत्काळ तिला खोडून काढले आणि अति चिकित्सा करण्याबद्दल हटकले. अशा तर्हेने साखरपुडा हि झाला. साखरपुड्याला आलेले सर्व पाहुणे नवरीला बघून अचंबित झाले होते. असे स्थळ उदय च्या घरच्यांनी का म्हणून पसंत केले हेच कुणाला उमगेनासे झाले.
साखरपुडा आणि लग्न ह्या मध्ये ६ महिन्यांचा कालावधी होता. एवढ्या अवधीतही दादा-वाहिनी आणि वैदेही चे सूर कधीच जुळले नाहीत. वैदेही नेहमीच एक प्रकारच्या गुर्मीत वावरत असे. तिचे लोकांच्यात मिसळणे पूर्णतः कृत्रिम आणि अनैसर्गिक भासत असे. दादा-वाहिनीला सतत काहीतरी खटकत होते. वर वर सगळे छान होते. तयारी जोरदार सुरु होती. वैदेही च्या घरचे हौशी होते. पण जिथे घरात येणाऱ्या नव्या सदस्या बद्दलच म्हणावी तेवढी खात्री वाटत नव्हती, तिथे ह्या वरवरच्या गोष्टी काय कामाच्या? दादा आणि वाहिनी चा विचार हळू हळू पक्का झाला. त्यांनी जवळच असलेल्या दुसर्या जागेत वेगळी चूल मांडायचा निर्णय घेऊन टाकला. आपल्या भावजयीने आपल्या आई-बाबांना आपलेसे केले तरी खूप झाले, हे ओळखून दादाने हा निर्णय घरी सांगितला. त्य दोघांच्या अपेक्षे प्रमाणे या निर्णयाचे अतिशय थंड स्वागत झाले. उलट थोडा वाईट पणाच पदरी पडला दोघांच्या. पण याला दुसरा इलाज नव्हता.

लग्न दणक्यात झाले. उदय-वैदेही केरळ ला गेले. ते आल्यावर महिन्याभरातच दादा-वाहिनी ने वेगळी चूल मांडली. इकडे वैदेही चा जॉब हि सुरु झाला . मार्केटिंग चा जॉब म्हणजे सतत शहरभर फिरती. जाण्याची वेळ ठरलेली पण परतायची नाही. रात्रीचे ९ काय, १० काय नवी नवरी घराबाहेर. घरी आल्यावर सुद्धा स्वारी तडक आपल्या खोलीत आणि दार बंद. घरातल्यांशी कुठलाच संबंध नसल्या सारखे तिचे बेबंद वागणे हळू हळू उदय च्या आईला खटकू लागले. सकाळी ९-१० ला उठणे, स्वतःचे आवरणे कि घराबाहेर पडणे. काही महिने वाट पाहून उदयने आईच्या सल्ल्याने तिला जॉब बदलायला अथवा सरळ सोडायला सांगितले. आता सगळे ठीक होईल असे आईला वाटत होते. व्याही सुद्धा मानपानात कसली कसूर ठेवत नव्हते. सर्व वर्ष सण व्याह्यांनी, उदयच्या आईबाबांच्या मनासारखे साजरे केले. जी कसूर त्यांच्या मते, मोठ्या सुनेच्या माहेरी राहून गेली होती, ती सर्व नवीन व्याह्यांनी भरून काढली होती.
किती महत्व देतो ना आपण असल्या फालतू गोष्टींना? सर्व घराचे मांगल्य हे बाहेरून घरात आलेल्या बाईवर अवलंबून असते. माशी जर तिथेच शिंकली असेल तर ह्या मानपानाच्या झालरी काय कामाच्या. इथे हि तसेच झाले. जॉब सुटला तरी वैदेही चा पाय काही घरात टिकला नाही. स्वतःचे आवरून सकाळी ११ च्या सुमारास खोलीबाहेर यायची ती बाहेर जायच्या तयारीनेच. मग उगवायची थेट वाढलेल्या पानावर. दुपारची वामकुक्षी ३-३// तासांची. संध्याकाळी परत बाहेर ते रात्री परत वाढलेल्या ताटावर हजर. घरातल्या कुठल्याच बाबतीत इंटरेस्ट नाही, माणसांची आवड नाही, बिनधास्त वर्तणुकीत स्वतःला धन्य मानणारी वैदेही बेताल वागत होती आणि उदय तिच्या प्रत्येक वर्तणुकीचे थातूर मातुर समर्थन आईबाबान पुढे करीत होता.

जॉब सुटल्यानंतर वैदेहीचा घरातील पहिला गणेश -उत्सव आला. दादा वाहिनी हि आले होते. हरताळके ची पूजा नुकतीच आटोपली होती. वैदेही खोलीत गुडूप झाली होती. आणि बाकी मंडळी इतस्ततः पेंगुळली होती. इतक्यात दादा-वाहिनीला अतिशय प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. दोघांनी चमकून एकमेकांकडे आणि लगेचच आईकडे पाहिले. आई सुद्धा कावरी बावरी झाली. एक उग्र दर्प उदय-वैदेही च्या खोलीतून येत होता. एव्हाना दादा-वाहिनीने तो दर्प ओळखला होता. आणि उदय ने हे काय नवे खूळ डोक्यात घेतले आहे असे आईला विचारणार, तोच दादाच्या लक्षात आले कि आपणच उदयला हार आणायला बाहेर पाठवले होते. आणि खोलीत तर वैदेही होती. आई, दादाच्या मनातील संशय ओळखून आणखीनच गार पडली. तिला जे काही दिवसांपासून जाणवत होते ते दादा-वाहिनी ला आल्या आल्या कळले. नव्हे आता तर त्यावर शिक्का मोर्ताबच झाले. त्या दिवशी, हरताळके च्या पूजेनंतर घरातले मांगल्य कायमचे हरपले. वैदेही ला सिगारेट चे व्यसन आहे हे कळताच मंडळी नखशिखांत हादरून गेली.
उदय ला याबाबत जेव्हा आईने जाब विचारला तेव्हा तो म्हणाला," अग, लग्नाआधी ती मला मोघम बोलली होती, पण मला वाटलं कि जाईल सवय हळू हळू. पण ती सवय फार पुढे गेली आहे. ती लग्न आधी बर्याचदा बिनधास्त पानपट्टी च्या ठेल्याशी जाऊन ओढत असे. पण आता तरी तसे करू नको, आमची लाज जाईल ,असे मी तिला बजावले आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून, सवय सुटेपर्यंत तिला मी आपल्या खोलीतच ओढ असे सांगितले आहे."

आईने कपाळावर हात मारून घेतला. उदय ने तिला यातले काही बाबांच्या कानावर न घालण्या बाबत विनवले. दादा तर कमालीचा खवळला होता. पण उदय च्या पडते घेण्याचा त्याला जास्त राग येत असे. दादाचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे. पण उदय आधीच मवाळ , त्यात स्वतः घेतलेला निर्णय आता कसाही करून साजरा करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. तो वैदेहीला सांभाळून घेण्याबाबत ठाम होता. हळू हळू ती निवळेल व कौटुंबिक प्रवाहात सामावेल अशी त्याला अशा होती. आईला त्याने कसे बसे थोपवले होते. दादा-वाहिनीला हि, आता आपला वेळीच वेगळे व्हायचा निर्णय अजिबात चुकला नाही, हे पुन्हा एकदा पटले. नवरा बायकोशी जमवून घेतोय न, घरातल्यांशी तिचे न का जमेना, असे मानून आईनेही आपली समजूत काढली. तरी व्हायचा तो त्रास कोणालाही चुकला नाही.
एकत्र कुटुंबातून आलेल्या वैदेहीने एकदाही त्यातले संस्कार उचलल्याचे आपल्या वर्तणुकीतून दर्शविले नाही. उलट आपल्या वाट्याचे कुणी हिरावून तर घेत नाही न याचीच तिला सतत धास्ती असे. दादा-वाहिनी जेवायला आले कि मुद्दाम त्यांच्यासमोर पोळ्या किती शिल्लक आहेत ते मोजणे आणि तसा उल्लेख करणे, आपापल्या वाढदिवशी दोघांचे चोरून केक आणून दोघांपुर्तेच सेलेब्रेत करणे असल्या गोष्टींचे घरात वैदेहीमुळे पेव फुटले. सर्वांच्या हे लक्षात येई. दादा तर घरी आल्या आल्या, आईने काही खायला दिले, तर प्रथम विचारी ,कि हे वैदेही ने नाही न आणले आणि मगच त्याला तोंड लावी. घरी येणारे पै-पाहुणे यांच्याशी हि वैदेही ने कधीच काहीच सोयर-सुतक ठेवले नाही. साधे बाहेर येऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचीही तिने कधी तसदी घेतली नाही. एकदा ओळख झालेल्या व्यक्तीला ती परत ओळख दाखवेल याची शाश्वती नसायची. वाहिनीवर तर ती आधीपासूनच खार खाऊन होती. जणू काही माहेरून ती शिकूनच आली असावी कि सासू आणि जाऊ यापासून सुरक्षित अंतर ठेऊनच वागावे, असेच तिचे दोघींशी वर्तन असे. त्यात वाहिनी आपल्या सासूची एवढी लाडकी म्हणून तिचा आणखी तिळपापड होई.
मग यथावकाश उदय आणि वैदेहीला एक गोंडस बाळ झाले- साहिल. आईला तर लहान मुलांचा प्रचंड लळा. आजी साहिल चे सर्व काही अत्यंत मायेने करायची. अनेकदा पहाटे रडणाऱ्या, जागवणार्या साहिल ला उदय, आजीकडे आणून सोडी आणि काही क्षणात आजी त्याला गाणी ऐकावीत झोपवे. त्याच्या खाण्या-पिण्याकडेही आजीचे जातीने लक्ष असे. पण वाहिनी ने जसा सोहम च्या बाबतीत आपल्या सासूवर डोळे मिटून विश्वास ठेवला तसे वैदेहीचे नव्हते.
एखाद्या मोलकरणीला विचारावे तसे बाहेरून आल्यावर वैदेही सासूला विचारी," अहो आई, त्याला काही खायला दिलंत कि नाही?" वास्तविक आईकडे तो काही ताक्ररीविना छान राहत असे. पण केलेल्याची जाण ठेवील ती वैदेही कसली.
हा रोजचा मनस्ताप आता आईला सहन होईना. वैदेही बदलायची चिन्ह दिसेनात. तशी नाईलाजाने आईने बाबांना, उदय-वैदेही ला वेगळे बिर्हाड करून देण्याची गळ घातली. वरची जागा रिकामी झाली तशी बाबांनी दोघांना आपला निर्णय कळवला. त्यावर बेदरकारपणे उत्तर मिळाले," जातो आम्ही वर, पण जास्त दिवस इथे नाही राहणार. वाहिनी वेगळी झाली तर तिला ५ खोल्यांचे घर दिले, तेवढे तरी आम्हाला द्यायचे. आम्हाला नाही राहायचे ३ खोल्यात."

आई-बाबांना वाईट वाटले, पण अजूनही कठोर शब्दात उदयची कान-उघडणी करायचे त्यांच्या मनाने घेतले नाही. हि कसली वेडी माया?. केवळ मुलगा दुरावेल या भीतीपोटी त्याच्या सर्व चुकांवर पांघरून घालण्याचा हा कसला अट्टाहास? दादा-वाहिनीला हा जगावेगळा न्याय काही केल्या समजेना. ती दोघं निमूट सर्व पहात आणि गप्प बसत. आपलं कर्म नेटाने करीत राहायचे एवढेच त्यांनी ठरवले होते. बाबांनी ३ खोल्यात पूर्ण रिनोवेशन करून फुल्ली फर्निश्ड ब्लॉक उदय च्या ताब्यात दिला. मंडळी दिवाळीच्या सुमारास वर राहायला गेली आणि आईने निश्वास टाकला. वाहिनी कित्ती वर्षांनी या दिवाळीत मुलांना घेऊन मोकळेपणी सासरी राहिली. घराचे ग्रहण थोडे का होईना सुटल्यासारखे वाटत होते. वर्षभरात आई-बाबांनी अनेक सहली केल्या. काश्मीर, केरळ,गोवा. खूप ठिकाणे फिरून आली दोघं.
सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असताना एकदा आई दादाला म्हणाली," अरे, परवा वैदेही कामाला बाहेर गेली होती आणि साहिल ने इकडे खाली कपडे ओले केले, म्हणून मी वर त्याचे कपडे आणायला गेले आणि कपाटात मला पुन्हा सिगारेट ची पाकिटे सापडली. काय करू रे, उदय च्या कानावर घालू का परत? मला तर काहीच सुचेनासे झाले आहे."
दादा ने तिला समजावीत म्हटले," सोडून डे आता, काही सांगायच्या फंदात पडू नकोस, नक्कीच उदय ला याची पूर्ण कल्पना आहे. त्यांचे ते आता बघून घेतील. "
पण नातवासाठी आजीचा जीव तुटत होता. त्याच्या बालमनावर ह्या वाईट सवयीचे पुढे होणारे दूरगामी परिणाम आजीला दिसत होते. पण आता वेळ निघून गेली होती. आजीला कळून चुकले होते, आपल्या हातात आहे तेवढे साहिल साठी करत राहायचे, पुढे तो आणि त्याचे नशीब.
आणि एके दिवशी आक्रीत घडले. आजी हृदयविकाराच्या झटक्याने तडकाफडकी भरल्या संसारातून निघून गेली. घरचे दारचे हळहळले. बाबा खचले. वहिनीची तर जणू आईच गेली होती. आता बाबा एकटे उरले मोठ्या घरात. उदय वर वेगळा झालेला, दादाही वेगळा झालेला. पण तिसर्या दिवशी दादा-वाहिनीचा निर्णय झाला होता. ते परत बाबांजवळ जुन्या घरी येणार होते. जवळच्या लोकांना हेच अपेक्षित होते. त्यांना एव्हाना कर्ता मुलगा कोण हे कळून चुकले होते.

साहिल आता थोडा मोठा झालाय. ३-४ वर्षांचा. आजी गेली तेव्हा आठवडाभर कावरा बावरा झालेला साहिल, आता आपल्या चुलत भावंडांशी खेळायला, खाली काका-काकू आणि आजोबांकडे येतो. त्याला मुलांची, माणसांची ओढ आहे. खाली असताना इतका रमतो कि दरवेळी जबरदस्तीने रडवून वर न्यावे लागते. पण हल्ली त्याचे वागणे वात्रट पणाच्या सीमारेषा ओलांडून फाजील पणाकडे जात असल्याचे दादा-वाहिनी च्या लक्षात आले आहे. तो रस्त्यात पडलेल्या सिगरेट च्या थोटका कडे बोट दाखवून ' हे आईचे' असे सांगतो. डाव्या तळव्यावर उजव्या तर्जनीने चोळल्या सारखे करून खोटे खोटे तोंडात काहीतरी खाऊन दाखवतो. त्याच्या तोंडात नको ते शब्दप्रयोग आलेत. कुणी रागावले, धाक दाखवला तर आक्रस्ताळेपणा करतो. त्याला सांभाळणाऱ्या बाईला फटाफट मारतो आणि बोच्कारतो. उदय त्याला वेळच्या वेळी ओरडत दटावत असतो, पण आई म्हणून वैदेही अजिबात त्याचे कान पिळत नाही. उलट त्याच्या फाजील चाळ्यांना तीच प्रोत्साहन देत राहते.
बाबा तर वास्तुशांत करून दिल्यापासून वरच्या घरची पायरीही चढलेले नाहीत. वैदेही सुद्धा कधी त्यांना आणि माहेरच्या माणसांशिवाय कोणालाच बोलावत नाही. बाबा तिला काडीचीही किंमत देत नाहीत, पण केवळ मुलाची बायको म्हणून सहन करतात.
बाबांचा एरव्ही जगप्रसिद्ध दरारा उदय च्याच बाबतीत कुठे लोप पावतो, हे आप्तस्वकीयांना अजूनही न उमगलेले कोडे आहे. पण दादा ने तोही अंदाज बांधला आहे. एकतर मुलावारची आंधळी माया, त्यात बघून ठरवून केलेले लग्न, अशा पेचात बाबा सापडणे स्वाभाविक आहे. उदय जरी खंबीर असता आणि वैदेही चुकतेय असे त्याने आधी स्वतः पाशी आणि घर्च्यान्पाशी कबूल केले असते, तरी बाबांनी त्याला या गर्तेतून बाहेर काढले असते. पण हेच उदय करीत नाही.

आजही वैदेही बद्दल उदयची काही कान-उघडणी केली तर दादा-वाहिनी च्या वाट्याला वाईट पणा खेरीज काही येत नाही. तो अजूनही तिच्या वागण्याचे समर्थनच करतो. तिचे व्यसन सुटणार नाही हे आता त्याने स्वीकारले आहे. त्याचे आपल्या मुलावर होणार्या दूरगामी परिणामान बद्दल त्याने सोयीस्कर पणे वेड पांघरलेय.
अशा प्रकारे ' विनाशकाले विपरीत बुद्धी' चा पाढा अजूनही चालूच आहे.......................................................................................................................

Tuesday, May 10, 2011

शुभेच्छा

#नवी पहाट

काल आपण भेटलो तेव्हा
नव्हता मोकळेपणा पूर्वीचा
पण जपत एकमेकांच्या भावना
चाचपडत गेलो भाव मनीचा

अवघडलेपण कधी नव्हे ते
का आले अपुल्या मध्ये
तुला मला जोडणारा धागा
का असा तुटला अर्ध्यामध्ये

आज असे नवी सुरवात तुझी
का पाणावती सारख्या कडा
हि खंत नव्हे रे जाणतोस तू हि
मला हि ना लागे मनाचा छडा

धागा जरी तुटला तरी
वीण आहे घट्ट अजुनी
क्षितिजावर हि पहाट नवी
देतेय साद पुन्हा नव्यानी

- मीनल देवस्थळे