Tuesday, January 9, 2018

adnyanacha buruj

अज्ञानात सुख असतं म्हणतात ते काही उगीच नाही .
आपल्याला मारे वाटतं - आपण संपन्न , शिक्षित घरात जन्मलो , आपल्याला संधी उपलब्ध झाल्या , म्हणजे आपण रूढी परंपरांपासून , लिंग भेदा पासून मुक्त आहोत .
पण  ......
 एखादा अनपेक्षित क्षण असा आदळतो आणि आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो .

आपल्याला समजतं   .......  आपण भराऱ्या घेतोय , पण  आपलं आकाश बंदिस्त आहे .
आपण विहार करतोय ... ... पण आखून दिलेल्या परिघात .

' आखून दिलेल्या ' या कडे आपली डोळेझाक होते ..... .... तिथेच आपण चुकतो .
भ्रमात फिरत राहतो , मोठ्या बाता  मारतो . आपल्याहून उच्च किंवा निम्न स्तरातील स्त्री वर्गा बद्द ल उसासे टाकत राहतो . लिंगभेद , जातीभेद , वर्णभेद इत्यादी सर्व प्रकारच्या विषमते बद्दल आपली मतं हिरीरीने मांडतो .

आणि अचानक एक दिवस हि विषमता आपल्या समोर दाण दिशी येऊन आदळते .
आपण गडबडतो , पण वस्तुस्थिती बदलत नाही .
आपल्या गावीही नसलेली एखादी शुल्लक घटना , जवळच्यांच्या भुवया उंचावून जाते .
आपण अतिशय निर्लेप मनाने भाग घेतलेल्या प्रसंगात , इतरांना नको ते कंगोरे दिसू लागतात .
आपल्याला अजिबात न शिवलेल्या विचारांनी बाकीचे ग्रस्त होतात .
आणि आपल्यावर कधीही कल्पना न केलेला घाव बसतो .
आपण दिवा स्वप्नातून जागे होतो .

घाव घालणारे आपलेच असतात .  त्यांना न जुमानण्याची परिस्थितीच नसते .
 पण तीच माणसं जेव्हा समजण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या त्यांचं आजवर माहित नसलेलं  रूप दाखवतात तेव्हा तर उरलं सुरलं अवसान गळून पडतं .

प्रसंग अनेक येतात .
आपल्याला मुक्तपणे स्वछंदी वृत्ती जोपासत वाढवणारे आपले आई वडील , मुलगी लग्नाच्या बाजारात आली , कि सपशेल माघार घेतात , संकुचित वागतात , तेव्हा एखाद्या मुलीला हेच वाटत असेल .

सुनेच्या अंगभूत कलांचं सर्वत्र कौतुक करताना , तिने त्या कला घरापुरत्याच ठेवाव्यात , त्या घराबाहेर विस्तारू नये , हे जेव्हा तिला सुचवलं जातं , तेव्हा एखाद्या सुनेला हेच वाटत असेल .

बायको सोशल ड्रिंकर चालते , नव्हे तिला मागे न पडण्यासाठी सोशिअल ड्रिंकिंग साठी प्रोत्साहित करणारे नवरे , तिला हव्या त्या उपक्रमात भाग ' घेऊ  देणारे ' नवरे जेव्हा केवळ पुरुष ग्रुप आहे म्हणून ट्रेक करू नको म्हणतात त्या बायकोला हि हेच वाटत असेल .

एकत्र वाढलेला , लाड करणारा , माहेरपणाला बोलावणारा भाऊ , जेव्हा बहिणी ने इस्टेटीवर सह्या करून तिचा वाटा  त्याला देऊन टाकावा अशी अपेक्षा करतो , तेव्हा त्या बहिणीला हि हेच वाटत असेल .

अनेक उदाहरणं दिसतील आजूबाजूला . प्रत्येकाचं ठाम मतही असेल आपापल्या बाजूचं . 

पण आपले बुरुज काही अंशी ढासळतात , हे मात्र खरं .
आता त्याला डागडुजी करून सावरून घ्यायचं , का पूर्णपणे जमीनदोस्त करून नव्याने किल्ला बांधायचा कि काहीच न झाल्यागत वावरायचं हे जिचं त